शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

विकास योजनांचे २० कोटी अडकले अपहारात

By admin | Updated: November 27, 2014 23:41 IST

पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण विकासासाठी थेट केंद्राकडून निधी पुरविण्यात येतो. प्रत्यक्षात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवकांकडून या निधीमध्ये मोठी अफरातफर केली जाते.

यवतमाळ : पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण विकासासाठी थेट केंद्राकडून निधी पुरविण्यात येतो. प्रत्यक्षात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवकांकडून या निधीमध्ये मोठी अफरातफर केली जाते. असा १९ कोटी ८१ लाख ३९ हजार ३९० रुपयांचा निधी अपहारात अडकला आहे. तब्बल एक हजार १४१ अपहाराची प्रकरणे अजूनही चौकशीत आहेत. जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतीत झालेल्या अपहाराची प्रकरणे आली आहेत. एकूण तीन हजार २१९ प्रकरणे आतापर्यंत दाखल झाली आहे. यापैकी दोन हजार २२० प्रकरणांची चौकशी करण्यात आली असून ११ कोटी ४१ लाख नऊ हजार ५२८ रुपये ग्रामसेवकांकडून वसूल करण्यात आले आहेत. मात्र उर्वरित एक हजार १४१ प्रकरणांची चौकशी सुरू असून त्यामध्ये जवळपास २० कोटी रुपये अडकले आहेत. ग्रामीण विकासासाठी शासनस्तरावरून मोठमोठ्या योजना आखल्या जातात. मात्र त्या योजना राबविताना संबंधित यंत्रणेकडून गावपातळीवर मोठा अपहार केला जातो. अनेक ठिकाणी तर ग्रामसेवकांनी बदली होवूनही आपला पदभार हस्तांतरितच केलेला नाही. त्यामुळे योजना राबविल्याबाबतचे अधिकृत दस्तावेजही मिळत नाही. अपहाराची तक्रार होवूनही दस्तावेज नसल्याने चौकशी करणे शक्य होत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक अपहाराची प्रकरणे घाटंजी पंचायत समिती अंतर्गत आहे. त्या खालोखाल पांढरकवडा, दारव्हा, नेर, यवतमाळ, राळेगाव, वणी या पंचायत समितींचा समावेश आहे. शासनाने दिलेला निधी योग्य कामी वापरला जाणे तर सोडाच अपहाराच्या चौकशी प्रलंबित राहात असल्यामुळे हा पैसा वेळेत वसूल करणेही शक्य होत नाही. याला गावपातळीवर केला जाणारा अपहार ही मुख्य बाब कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)