शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

रात्री २ वाजतापर्यंत होती एटीएमवर तोबा गर्दी

By admin | Updated: November 10, 2016 01:42 IST

मंगळवारी मध्यरात्रीपासून केंद्र शासनाने चलनातील ५०० आणि १००० हजारांच्या नोटा अचानक बंद करताच

दोन दिवस त्रास : नंतर सर्व व्यवहार सुरळीत होणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाची शहरातील पेट्रोल पंपांना भेटयवतमाळ : मंगळवारी मध्यरात्रीपासून केंद्र शासनाने चलनातील ५०० आणि १००० हजारांच्या नोटा अचानक बंद करताच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात एकाच गोंधळ उडाला. बातमी आली अन् सर्वच एटीएमवर एकच गर्दी उसळली. काहींनी लगेच ५०० व १००० च्या नोटा एटीएमव्दारे भरल्या, तर काहींनी ४०० रूपयापर्यंतची रक्कम काढण्यासाठी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर २ वाजतापर्यंत रांग लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदर्शवरून राष्ट्राला संंबोधित करताना ५०० आणि १००० नोटा बंद करीत असल्याचे जाहीर केले. त्यांनी घोषणा करताच शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँंक चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमवर एकच गर्दी उसळली. तेथे आॅपरेटरही नव्हते. प्रोसेसिंगला वेळ लागत होता. त्यामुळे पैसे काढण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांनी रात्री २ वाजतापर्यंत जागली करावी लागली. पेट्रोल पंपावरही गर्दी उसळली. बुधवारी सकाळपासून पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी झाली. प्रत्येक वाहनधारक १००० आणि ५०० ची नोटच देत होता. परिणामी काही वेळातच त्यांच्याकडील चिल्लर पैसे संपल्याने चक्क ग्रहकांमध्येच वादावादी सुरू झाली.पेट्रोल पंपधारकांनी १००० आणि ५०० च्या नोटा घेणे बंद करताच ग्राहकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. लगेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांच्या पथकाने अनेक पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. नोटा बंद होताच बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतही एकच गोंधळ उडाला. मंगळवारी रात्री ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल विकून या नोटा घेतल्या, त्यांची मोठी पंचाईत झाली. बुधवारी शेतमालाचा लिलाव झाला, मात्र शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही. आता त्यांना पोस्ट डेटेड चेकने पैसे दिले जातील. दरम्यान, मंगळवारपर्यंत बाजार समितीने सर्व खरेदीच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापूस खरेदीला यामुळे मोठा फटका बसला आहे. मात्र ही स्थिती केवळ दोन ते तीन दिवसच कायम राहणार असून त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होणार आहे. तोपर्यंत दोन दिवस सर्वांनाच कळ सोसावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)