शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रात्री २ वाजतापर्यंत होती एटीएमवर तोबा गर्दी

By admin | Updated: November 10, 2016 01:42 IST

मंगळवारी मध्यरात्रीपासून केंद्र शासनाने चलनातील ५०० आणि १००० हजारांच्या नोटा अचानक बंद करताच

दोन दिवस त्रास : नंतर सर्व व्यवहार सुरळीत होणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाची शहरातील पेट्रोल पंपांना भेटयवतमाळ : मंगळवारी मध्यरात्रीपासून केंद्र शासनाने चलनातील ५०० आणि १००० हजारांच्या नोटा अचानक बंद करताच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात एकाच गोंधळ उडाला. बातमी आली अन् सर्वच एटीएमवर एकच गर्दी उसळली. काहींनी लगेच ५०० व १००० च्या नोटा एटीएमव्दारे भरल्या, तर काहींनी ४०० रूपयापर्यंतची रक्कम काढण्यासाठी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर २ वाजतापर्यंत रांग लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदर्शवरून राष्ट्राला संंबोधित करताना ५०० आणि १००० नोटा बंद करीत असल्याचे जाहीर केले. त्यांनी घोषणा करताच शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँंक चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमवर एकच गर्दी उसळली. तेथे आॅपरेटरही नव्हते. प्रोसेसिंगला वेळ लागत होता. त्यामुळे पैसे काढण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांनी रात्री २ वाजतापर्यंत जागली करावी लागली. पेट्रोल पंपावरही गर्दी उसळली. बुधवारी सकाळपासून पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी झाली. प्रत्येक वाहनधारक १००० आणि ५०० ची नोटच देत होता. परिणामी काही वेळातच त्यांच्याकडील चिल्लर पैसे संपल्याने चक्क ग्रहकांमध्येच वादावादी सुरू झाली.पेट्रोल पंपधारकांनी १००० आणि ५०० च्या नोटा घेणे बंद करताच ग्राहकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. लगेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांच्या पथकाने अनेक पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. नोटा बंद होताच बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतही एकच गोंधळ उडाला. मंगळवारी रात्री ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल विकून या नोटा घेतल्या, त्यांची मोठी पंचाईत झाली. बुधवारी शेतमालाचा लिलाव झाला, मात्र शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही. आता त्यांना पोस्ट डेटेड चेकने पैसे दिले जातील. दरम्यान, मंगळवारपर्यंत बाजार समितीने सर्व खरेदीच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापूस खरेदीला यामुळे मोठा फटका बसला आहे. मात्र ही स्थिती केवळ दोन ते तीन दिवसच कायम राहणार असून त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होणार आहे. तोपर्यंत दोन दिवस सर्वांनाच कळ सोसावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)