शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

१८० विहिरी अद्यापही अपूर्ण

By admin | Updated: January 12, 2015 23:00 IST

तालुक्यात धडक सिंचन योजने अंतर्गत ९९० विहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ८१० विहिरी पूर्ण झाल्या असून, १८० विहिरी अद्यापही अपूर्ण आहेत.

महागाव : तालुक्यात धडक सिंचन योजने अंतर्गत ९९० विहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ८१० विहिरी पूर्ण झाल्या असून, १८० विहिरी अद्यापही अपूर्ण आहेत. धडक सिंचन योजनेंतर्गत २००९ ते २०१० या वर्षात ही मोहीम राबविण्यात आली. पंचायत समितीला एक लाख रुपयात विहिरी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. त्यावेळी ३४० विहिरींपैकी २२३ विहिरी पूर्ण केल्या गेल्या. उर्वरित ११७ पैकी ४८ प्रगतीपथावर व ३९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. परंतु कामे मात्र झाली नाही. ३० लाभार्थ्यांनी नियम व अटींची पूर्तता केली नसल्यामुळे या विहिरी रद्द झाल्या. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व काही शेतकऱ्यांच्या एक लाख रुपयात विहिरी होणार नाही म्हणून आॅगस्ट २०१४ मध्ये शासनाच्या नवीन आदेशानुसार विहिरींचे पुनर्गठण करण्याचे सुचविले. या विभागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या हेतुने अर्धवट राहिलेल्या १८० विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या. सुरूवातीला एक लाख रुपये व आता सुधारित वाढीव दीड लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये बांधकामासाठी वाढविण्यात आले आहे. मनरेगाचे प्रशासकीय कामकाज तहसीलदारांकडे गेल्यामुळे त्यांनी एकाच विभागावर कामाचा बोजा पडू नये यासाठी विभागाप्रमाणे ते वाटून दिले. यामध्ये त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना ४३ विहिरींचे प्रस्ताव व सुधारित अंदाजपत्रक सादर करावयाचे होते. परंतु त्यांनी दोन प्रस्ताव दिले व त्याला मान्यता मिळाली. त्यानंतरही काम सुरू झाले नाही. उर्वरित ४१ प्रलंबित सुधारित अंदाजपत्रक न दिल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. उपविभागीय बांधकाम विभागाने २८ शेतकऱ्यांच्या विहिरींच्या बांधकामाचे प्रस्ताव देण्याचे सुचविले. परंतु यामध्येही एकही प्रस्ताव न मिळाल्याने कामे प्रलंबित आहेत. तसेच पुसदच्या सामाजिक वनिकरणाचे लागवड अधिकारी यांनी २५ कामांची मान्यता दिली. त्यापैकी दोन कामे उटी व माळवागद येथे करण्यात आली. उपअभियंता प्रकल्प कार्यालयाला नऊ विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले, परंतु अंदाजपत्रका अभावी ते सुद्धा प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागाला १३ प्रस्ताव दिले. या कार्यालयाला चार अंदाजपत्रक दिल्यामुळे चारही कामांना मान्यता दिली जाईल असे तहसीलदारांकडून कळविण्यात आले आहे. पंचायत समितीला ६२ विहिरींचे उद्दिष्ट दिले त्यापैकी ५८ विहिरींना मान्यता मिळाली असून, काम सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात नापिकीचे संकट आहे. अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी कमी झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर विहिरी खोदून दिल्यास त्याला दिलासा मिळेल. तसेच राजगार हमीची कामे मजुरांच्या हाताला काम मिळेल. याबाबत शासनाने विचार करून त्वरित कामे सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य परसराम डवरे यांनी केली आहे.