शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामपंचायतीसाठी मिळाला 177 कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधी जीपीडीपी विकास आराखड्यानुसार खर्च करायचा आहे. त्यामध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. बंदीत आणि अबंदीत योजनेच्या माध्यमातून हा निधी खर्च करायचा आहे. बंदीत नियमामध्ये ५० टक्के रक्कम स्वच्छता आणि पाणीपुरवठा या योजनेवर खर्च करावी लागणार आहे, तर अबंदीत नियमामध्ये २५ टक्के निधी शिक्षण आणि आरोग्यासाठी, १० टक्के निधी महिला बालकल्याणसाठी, तर १५ टक्के निधी मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरांचा विकास होत असताना गावाचा विकास मात्र झालाच नाही. गावाला आत्मनिर्भर करण्यासाठी पंचायतराज व्यवस्था वित्त आयोगाच्या माध्यमातून बळकट करण्यात येत आहे. सहा टप्प्यांत जिल्ह्याला १७७ कोटी मिळाले.यामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांचा निधी १५ व्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतीला मिळणार आहे. यामध्ये ८० टक्के निधी ग्रामपंचायतीला, तर दहा टक्के निधी जिल्हा परिषद आणि उर्वरित दहा टक्के निधी पंचायत समितीसाठी खर्च करता येणार आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आल्या आहेत. 

बंदीत आणि अबंदीत तत्त्वाचा वापर- ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधी जीपीडीपी विकास आराखड्यानुसार खर्च करायचा आहे. त्यामध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. बंदीत आणि अबंदीत योजनेच्या माध्यमातून हा निधी खर्च करायचा आहे. बंदीत नियमामध्ये ५० टक्के रक्कम स्वच्छता आणि पाणीपुरवठा या योजनेवर खर्च करावी लागणार आहे, तर अबंदीत नियमामध्ये २५ टक्के निधी शिक्षण आणि आरोग्यासाठी, १० टक्के निधी महिला बालकल्याणसाठी, तर १५ टक्के निधी मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना आहेत. 

विकासकामे मार्गी लागणारगावाच्या विकासासाठी निधी मिळाला. त्यासोबतच अनेक जाचक अटीही लावण्यात आल्या. ग्रामपंचायतीला निधी खर्च करण्यासाठी काही निर्णय घेताना अनेक अडचणी आहेत. त्या शिथिल कराव्यात. याशिवाय गाव विकासासाठी मोठा निधी देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून पावले उचलावीत.              - गजानन डोमाळे, उपसरपंच 

१५ व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी अतिशय तोकडा आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार हे पैसे येतात, गावात रस्ता बनवायचा म्हटले तर मोठा निधी लागतो. या पैशातून फारशी दुरुस्ती गावांमध्ये होत नाही. आमदार, खासदार निधीप्रमाणे गावाला मोठा निधी पाहिजे आहे, तरच गाव शहराप्रमाणे स्मार्ट बनविता येईल.  - संतोष गदई, उपसरपंच

ग्रामपंचायतीला आतापर्यंत विकासकामांसाठी काही निधी वळता झाला. मात्र, हा निधी गावाच्या दृष्टीने अपुरा आहे. नालीचे बांधकाम घ्यायचे असेल तर मिळणाऱ्या रकमेत ते काम पूर्ण करता येत नाही. विकास कामाला या निधीतून गती मिळत आहे; परंतु ज्या प्रमाणात निधी आवश्यक आहे, त्या प्रमाणात पैसा गावाला उपलब्ध होत नाही. - गजानन गुल्हाने, उपसरपंच

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जीपीडीपी अत्यावश्यक - ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीला निधी मिळत आहे. हा निधी मिळत असला तरी त्याच्यासाठी प्रारंभी जीपीडीपी म्हणजेच ग्रामपंचायतीच्या विकासाचा आराखडा तयार करायचा आहे. - त्यानंतर तयार झालेल्या नियोजनातून प्राधान्यक्रमानुसार हा निधी कामांवर खर्च करायचा आहे. - जीपीडीपी ठरविताना ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक कर्मचारी यासह ग्रामसभा घेवून नागरिकांकडून त्यांच्या मागण्या घ्यायच्या असतात. संपूर्ण माहिती घेवून विकास आराखडा तयार होतो.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत