रूपेश उत्तरवार - यवतमाळ‘एकीचे बळ’ या वाक्प्रचाराचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर जिल्ह्यातील निर्मल झालेल्या १७६ गावांना भेट दिलीच पाहिजे. गावकऱ्यांच्या एकीने गावाचा कसा कायापालट करात येतो हे येथील नागरिकांनी दाखवून दिले आहे. या गावात परिवर्तनाची पहाट उगवली असून श्रम प्रतिष्ठेतून गावत नंदनवन फुलले आहे. देशात २००१ पासून स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला. २००२ मध्ये जिल्ह्यात या अभियाना प्रारंभ झाला. अलीकडे या अभियानाचे नाव बदलले. निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा वसा अखंडपणे पुढे सुरू राहणार आहे. त्याचाच हा वृत्तांत. जिल्ह्यातील २ हजार ४० गावांपैकी १२० गावे निर्मल झाली आहेत. तर ५६ गावे नव्याने प्रस्तावीत आहेत. ५०० लोकसंख्येपासून ते दहा हजार लोकवस्तीपर्यंतची ही गाव आदर्श ठरली आहेत. ५० हजारापासून ते सात लाखापर्यंतचे बक्षीस या गावांनी पटकाविले आहेत. सौर उर्जेवरील पथदीवे, हातपंप, गोबर गॅस, निधूर चुल या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण होत आहे. गावामध्ये कुऱ्हाड बंदी असून अवैध वृक्षतोडीला आळा बसला आहे. या गावांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यापूर्वी बैठक घेतली जाते. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतले जातात. गावातील अबालवृध्द कामाला लागतात. या गावांनी आपला सर्व आळस बाजुला सारला आहे. गावाला नंदनवन करण्याचाच वसा घेतला.
१७६ गावांत उगवली परिवर्तनाची पहाट
By admin | Updated: September 21, 2014 23:57 IST