शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांनंतर पार पडली ‘डीआरडीए’ची आमसभा

By admin | Updated: August 19, 2014 23:58 IST

केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री

यवतमाळ : केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष आणि उर्वरित खासदार, आमदार, सर्व प्रमुख अधिकारी सदस्य आहेत. त्यानंतरही या संस्थेची गेल्या १७ वर्षापासून एकही सर्वसाधारण सभाच झाली नाही. मंगळवारी ही सभा घेण्याचे औदार्य पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दाखविले. मजेशीर बाब म्हणजे १९९७ मध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त २०१४ मध्ये कायम करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणकडून यापूर्वी अनेक योजना राबविण्या येत होत्या. तेव्हा या विभागाकडे तत्कालीन पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पूर्णत: दुर्लक्षच केले. मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांनी सुध्दा सर्वसाधारण सभा घेण्याची तसदी घेतली नाही. आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडच्या अनेक योजन बंद झाल्या आहेत. प्रास्तावित आराखडे मंजूर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात निधीच उपलब्ध करून दिला नाही. अशा अवस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी आणि प्रकल्प अधिकारी विनय ठमके यांच्याकडून कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच तब्बल १७ वर्षानंतर सर्वसाधारण सभेचा योग जुळून आला. या ऐतिहासिक बैठकीला मंत्री, आमदार, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दरवर्षी आमसभा होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र याकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले होते. मंगळवारी झालेल्या सभेत लेखा अहवाल मंजूर करण्यात आला. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्व्हेक्षण लवकर करण्याचा ठराव घेण्यात आला. सर्वांना घरकूलाचा लाभ देण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. प्रत्येकला घरकुलासाठी एक लाख रुपये निधी देण्याचा ठराव घेतला. झरी आणि मारेगाव या तालुक्यांना ग्रामीण जीवन्नोती अभियानातून इंटेन्सीव्ह देण्याचा ठराव झाला. शासनाने घरकुलासाठी लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी असा ठराव घेण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची दरवर्षी नियमित आमसभा झाली असती अनेक कामांना गती मिळाली असती. ज्या समितीमध्ये पालकमंत्री पदसिध्द अध्यक्ष, विभागीय उपायुक्त उपाध्यक्ष, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी, विविध बँकेचे व्यवस्थाप, शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख सदस्य असलेल्या समितीचीच सभा झाली नाही. यापेक्षा दुसरी ग्रामीण जनतेसाठी कोणतीच शोकांतिका नाही. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शेकडो योजना राबवूनही त्याचे परिणाम का दिसत नाही, हे यावरून उजागर होते. (कार्यालय प्रतिनिधी)