शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

१७ वर्षांनंतर पार पडली ‘डीआरडीए’ची आमसभा

By admin | Updated: August 19, 2014 23:58 IST

केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री

यवतमाळ : केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष आणि उर्वरित खासदार, आमदार, सर्व प्रमुख अधिकारी सदस्य आहेत. त्यानंतरही या संस्थेची गेल्या १७ वर्षापासून एकही सर्वसाधारण सभाच झाली नाही. मंगळवारी ही सभा घेण्याचे औदार्य पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दाखविले. मजेशीर बाब म्हणजे १९९७ मध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त २०१४ मध्ये कायम करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणकडून यापूर्वी अनेक योजना राबविण्या येत होत्या. तेव्हा या विभागाकडे तत्कालीन पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पूर्णत: दुर्लक्षच केले. मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांनी सुध्दा सर्वसाधारण सभा घेण्याची तसदी घेतली नाही. आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडच्या अनेक योजन बंद झाल्या आहेत. प्रास्तावित आराखडे मंजूर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात निधीच उपलब्ध करून दिला नाही. अशा अवस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी आणि प्रकल्प अधिकारी विनय ठमके यांच्याकडून कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच तब्बल १७ वर्षानंतर सर्वसाधारण सभेचा योग जुळून आला. या ऐतिहासिक बैठकीला मंत्री, आमदार, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दरवर्षी आमसभा होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र याकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले होते. मंगळवारी झालेल्या सभेत लेखा अहवाल मंजूर करण्यात आला. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्व्हेक्षण लवकर करण्याचा ठराव घेण्यात आला. सर्वांना घरकूलाचा लाभ देण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. प्रत्येकला घरकुलासाठी एक लाख रुपये निधी देण्याचा ठराव घेतला. झरी आणि मारेगाव या तालुक्यांना ग्रामीण जीवन्नोती अभियानातून इंटेन्सीव्ह देण्याचा ठराव झाला. शासनाने घरकुलासाठी लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी असा ठराव घेण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची दरवर्षी नियमित आमसभा झाली असती अनेक कामांना गती मिळाली असती. ज्या समितीमध्ये पालकमंत्री पदसिध्द अध्यक्ष, विभागीय उपायुक्त उपाध्यक्ष, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी, विविध बँकेचे व्यवस्थाप, शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख सदस्य असलेल्या समितीचीच सभा झाली नाही. यापेक्षा दुसरी ग्रामीण जनतेसाठी कोणतीच शोकांतिका नाही. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शेकडो योजना राबवूनही त्याचे परिणाम का दिसत नाही, हे यावरून उजागर होते. (कार्यालय प्रतिनिधी)