शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

१७ हजार शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकेचे दार बंद

By admin | Updated: May 23, 2015 00:01 IST

तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांना पुनर्कजासाठी बँकेचे दार बंद करण्यात आले असून खरीप हंगामात या शेतकऱ्यांना....

कर्जाचे ओझे : केवळ दोन हजार शेतकऱ्यांनाच कर्ज पुरवठा महागाव : तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांना पुनर्कजासाठी बँकेचे दार बंद करण्यात आले असून खरीप हंगामात या शेतकऱ्यांना सावकाराच्याच दारात जावे लागणार आहे. १९ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ दोन हजार शेतकऱ्यांनीच कर्जाची परतफेड केल्याने त्यांनाच नव्याने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. महागाव तालुक्यात गत तीन वर्षांपासून सारखा दुष्काळ पडत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तसेच रबी हंगामात गारपिटीनेही शेतकरी गारद होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात एक पैसाही राहिला नाही. आता खरीप हंगाम ऐन तोंडावर आला आहे. अशा स्थितीत शेतकरी जिल्हा बँकेकडे कर्जासाठी पाठपुरावा करीत आहे. जिल्हा बँकेने गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्याचे ठरविले होते. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात बँकेने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु शेतकरी हिताचे निर्णय संथ गतीने होत असल्याने शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. बँकेच्या धोरणात बदल होऊन कर्जाचे पुनर्गठण होईल या आशेवर अनेक शेतकरी आहे. १९ हजार शेतकऱ्यातून केवळ दोन हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. यावरून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाची कल्पना येते. १७ हजार शेतकऱ्यांना संजीवनी द्यायची झाल्यास महागाव तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बँकेच्या संचालकांनी जिल्हा बँकेच्या बोर्ड सभेत कर्जाच्या पुनर्गठणाबाबत आवाज उठविण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. अन्यथा कर्ज न मिळाल्यास १७ हजार शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार आहे. (शहर प्रतिनिधी)७७ कोटी वसुलीचे उद्दिष्ट महागाव तालुक्यातील २८ सोसायट्यांमधून वितरित केलेले ७७ कोटी रुपये कर्ज वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी केवळ २ हजार २०० सभासदांनी १० कोटी ३८ लाख रुपये कर्जाची परतफेड केली आहे. चालू कर्जाच्या २५ टक्के वसुली न केल्याने मुडाणा, वरोडी, लेवा, धनोडा, हुडी आणि माळेगाव या सात सोसाट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गतवर्षीच गोठविण्यात आले होते. या सातही सोसायट्यांचे वाटप आता थेट बँकेमार्फत करण्यात येत आहे. कर्जाची परतफेड करण्यात सोसायट्या आणि संबंधित शेतकरी कोठे कमी पडत आहे याबाबत संशोधन करणे गरजेचे आहे.