शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

१७ बाजार समित्यांना ३४ तज्ज्ञ संचालकांची प्रतीक्षा

By admin | Updated: December 30, 2015 02:50 IST

जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ३४ तज्ज्ञ संचालक नेमले जाणार आहेत. मात्र बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व : मात्र भाजपा-सेनेची मोर्चेबांधणी यवतमाळ : जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ३४ तज्ज्ञ संचालक नेमले जाणार आहेत. मात्र बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे आणि तेथे तज्ज्ञ संचालक होण्यासाठी भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर लोकनियुक्त संचालक मंडळ राहते. त्यांचा बहुतांश शेतीशीच संबंध राहतो. मात्र तांत्रिक दृष्ट्या एक्सपर्ट त्यात नसतो. म्हणून असा एक्सपर्ट संचालक नेमून त्याच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विकास योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. म्हणूनच शासनाने १७ आॅगस्ट २०१५ रोजी सर्व बाजार समित्यांवर तज्ज्ञ संचालक नेमण्याचे आदेश जारी केले. पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांवर चार तर पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्नाच्या बाजार समितीवर दोन संचालक नेमण्याचे आदेश आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. मात्र त्यापैकी कुणाचेही उत्पन्न पाच कोटींपेक्षा जास्त नाही. त्यामुळे सर्व बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी दोन तज्ज्ञ संचालक नेमले जाणार आहेत. बाजार समितीने नाव निश्चित करून सहकार प्रशासनाकडे पाठवायचे आणि नंतर शासन त्यावर निर्णय घेईल, अशी ही प्रक्रिया आहे. शासनाचा आदेश निघून साडेतीन महिने लोटले मात्र जिल्ह्यातील कोणत्याही बाजार समितीत अद्याप तज्ज्ञ संचालकाची नियुक्ती होऊ शकलेली नाही. बाजार समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी संचालक पदावर आहे. मात्र तेथे तज्ज्ञ संचालक म्हणून का होईना वर्णी लावून घेण्यासाठी भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न चालविले आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. तर एका विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपा-सेनेचे सहकार क्षेत्रात नेटवर्क नाही. परंतु तज्ज्ञ संचालकाच्या आडून बाजार समितीत बस्तान बसविण्याचा सेना-भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील १७ पैकी सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने तेथे सहायक निबंधकांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, वणी, दारव्हा, नेर व बोरीअरब या बाजार समित्यांचा समावेश आहे. यातील केवळ नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक लागली आहे. १७ जानेवारी रोजी त्याचे मतदान होईल. अन्य बाजार समित्यांच्या मतदार याद्या मागण्यात आल्या होत्या. मात्र त्याच वेळी या निवडणुकांना स्थगनादेश मिळाला. मात्र औरंगाबाद उच्च न्यायालयाने हा स्थगनादेश उठविल्याने मतदार याद्यांची प्रक्रिया आता पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)