शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
Viral Video : वीटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
4
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
5
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
6
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
7
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
8
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
9
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
10
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
11
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
12
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
13
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
14
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
15
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
16
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
17
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
18
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
19
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
20
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

१६० गाळ्यांच्या लिलावाला ‘स्टे’

By admin | Updated: January 16, 2016 02:43 IST

येथील नगरपरिषदेच्या १६० गाळ्याचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

‘अच्छे दिन’ : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, नगर विकास राज्यमंत्र्यांचा दिलासाम.आसिफ शेख वणीयेथील नगरपरिषदेच्या १६० गाळ्याचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे गाळेधारक संभ्रमात सापडले होते. त्यानंतर गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे १६० गाळेधारकांना ‘अच्छे दिन’ आले आहे.सध्या येथील नगरपरिषद गाळ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधी चौक व भाजी मंडीतील १६० गाळे नगरपरिषदेने खाली करून घ्यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन करून संपूर्ण गाळ्यांचा नव्याने जाहीर लिलाव करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे गाळेधारकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. नगरपरिषदेला ५७ वर्षांपूर्वी तत्कालीन मध्य प्रदेश शासनाने बाजार चौकासाठी शिट क्रमांक १९ अ व १९ ब मधील २५ हजार ५०० चौरस फूट जागा व भाजी मंडी शिट क्रमांक १९ सीमधील प्लॉट क्रमांक ८९१३ ही जागा वार्षिक मूल्यांकन लावून दिली होती. त्यावर नगरपरिषदेने गाळ्यांचा मर्यादित काळासाठी लिलाव केला होता. त्यावेळी भाडे अत्यल्प होते. सध्या तेच भाडे गाळेधारक देत असून त्यामुळे नगरपरिषदेला कोट्यवधींचा फटका बसत आहे. आता बहुसंख्य गाळ्यांचे मूळ मालक हयात नाहीत. अनेकांनी गाळे परस्पर विकले आहे. काहींनी जुन्या गाळ्यांची तोडफोड करून परवानगी न घेताच दुसरा मजला चढविला आहे. सध्या या जागेची किंमत १० हजार रूपये चौरस फूट आहे. भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी २००१ पासून भाडेच दिले नाही, अशी माहिती आहे. नगरपरिषदेचे होणारे नुकसान लक्षात घेता स्विकृत नगरसेवक पी.के. टोंगे यांनी गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्याची मागणी केली होती. तसा ठराव नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केलीच नाही. शेवटी टोंगे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आदेश करून अर्जदारास १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करावे व त्यांनी सहा आठवड्यात सदर निवेदनावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल दाखल करण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करून १६० गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले. त्यांच्या आदेशाविरूद्ध गुरूमुख केशवाणी व इतर गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अपिल केले होते. गाळेधारकांच्या अपिलाच्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्र्यांनी या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रकरणातील गाळ्यांचे मूल्यांकन नगररचना विभागाकडून करून घेऊन भाडे आकारणी करावी. तोपर्यंतच्या कालावधीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश स्थगित ठेवावा, असे पत्र पाठविले. तसेच गाळे ३० वर्षांच्या कालावधीकरिता भाडे पट्टीवर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी विहित कार्यपद्धतीवर अवलंबून तातडीने सादर करावा, असे पत्र जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन संचालक व नगरपरिषदेला पाठविले आहे. याप्रकरणी गांधी चौकातील सुशिक्षित बेरोजगार तथा फळ विक्रेत्यांनी नगरपरिषदेकडे गाळेधारक नियमबाह्य काम करून कोट्यवधींचे नुकसान करीत असल्याची तक्रार केली होती. तसेच गाळे लिलाव केल्यास आम्ही ते घेण्यास सक्षम आहोत, असे म्हटले होते. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना गांधी चौकात अद्याप मोठ्या प्रमाणात दुमजली बांधकाम सुरूच आहे.