शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

१५ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ मध्ये १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. १५० कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांना पाच टप्प्यात परतफेड करायची होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या आदेशानुसार या कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी राज्य बँकेने जिल्हा बँकेला निधीच उपलब्ध करून दिला नाही. यामुळे नव्याने पुनर्गठीत कर्ज या शेतकऱ्यांना मिळाले नाही.

ठळक मुद्देना कर्ज मिळाले ना कर्जमाफी : पुनर्गठित कर्जदारांचा आदेशात उल्लेखच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन कर्जमुक्ती योजनेत पुनर्गठीत कर्जाचा उल्लेख नाही. यामुळे कर्जाचे पुनर्गठन झालेले १५ हजार शेतकरी अडचणीत आले आहे. त्यांना पुनर्गठन झाल्यानंतर नव्याने कर्ज मिळाले नाही. कर्जमुक्ती योजनेतही अशा शेतकऱ्यांची नावे नाही. आता वंचित १५ हजार शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाचीच आवश्यकता आहे.महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच त्यांनी कर्जमुक्ती योजनची घोषणा केली. दोन लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना माफ करण्यात येणार होते. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ मध्ये १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. १५० कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांना पाच टप्प्यात परतफेड करायची होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या आदेशानुसार या कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी राज्य बँकेने जिल्हा बँकेला निधीच उपलब्ध करून दिला नाही. यामुळे नव्याने पुनर्गठीत कर्ज या शेतकऱ्यांना मिळाले नाही. आता कर्जमुक्ती आदेश काढताना २०१७ च्या थकीत कर्जाचा त्यामध्ये उल्लेख आहे. मात्र जे कर्ज पुनर्गठीत झाले, त्याचे पाच हप्ते पाडले. त्यानुसार त्याचा परतफेडीचा कालावधी अद्यापही बाकी आहे. यामुळे असे शेतकरी नियमित कर्जदाराच्या यादीत आले आहेत.१५ हजार शेतकरी थकीत आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. कर्जमुक्ती आदेशात कर्ज पुनर्गठनाचा उल्लेखच आला नाही. यामुळे हे शेतकरी २०१७ चे थकबाकीदार असतानाही कर्जमुक्तीला पात्र ठरले नाही. आता या शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी नव्याने अध्यादेशाची आवश्यकता आहे. त्याकरिता धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे असे शेतकरी थकीत असले तरी त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.ही तांत्रिक बाब आहे. अध्यादेशात उल्लेख नसल्याने जिल्हा बँकेचे १५ हजार शेतकरी कर्जमुक्तीला मुकले आहेत. धोरणात्मक निर्णयाची यासाठी गरज आहे.- अरविंद देशपांडे, मुख्य कार्यकारीअधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज