शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

१५०० उमेदवारांवर अपात्रतेचा बडगा

By admin | Updated: July 14, 2015 01:46 IST

पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या तब्बल १५०० उमेदवारांवर

यवतमाळ : पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या तब्बल १५०० उमेदवारांवर अपात्रतेचा बडगा उगारला जाणार आहे. विहित मुदतीत खर्च सादर न करणे, प्रशासनाने बजावलेल्या नोटीसला उत्तर न देणे यावरून आता अखेरची सुनावणी होऊन या उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यातील ४२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सुमारे सात हजार ५०० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. मात्र यातील बहुतांश उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च प्रशासनाला सादर केला नाही. त्यामुळे प्रशासनाने ३० दिवसाच्या आत खर्चाचा हिशेब सादर करण्याची नोटीस एप्रिल महिन्यात बजावली. त्यानंतरही अनेक उमेदवारांनी प्रशासनाला प्रतिसादच दिला नाही. तब्बल १५०० उमेदवारांनी एक महिन्याची मुदत संपूनही निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून या सर्व उमेदवारांवर अपात्रतेची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामध्ये दीडशे ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश आहे. निवडणूक विभागाने दारव्हा, नेर, उमरखेड, राळेगाव, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी, वणी, मारेगाव या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी अपात्रतेच्या अनुषंगाने सुनावणी घेतली. शेवटची संधी म्हणून या उमेदवारांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात आले होते. आता मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई निश्चित मानली जात आहे. येत्या आठ दिवसात या सर्व उमेदवारांवर कारवाई करून त्यांना कारवाईच्या दिनांकापासून पुढील पाच वर्ष कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. याशिवाय जे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे सदस्यत्वही तत्काळ रद्द होणार आहे. या कारवाईतून केवळ पुसद आणि आर्णी या दोन तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि उमेदवार अपवाद ठरले आहे. त्यांनी निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या मुदतीतच निवडणूक खर्चाचे विवरण सादर केले. आता महागाव आणि दिग्रस या दोन तालुक्यात मंगळवारी सुनावणी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकींची धामधूम आटोपल्यानंतर ही अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत निवडणूक खर्च सादर न केल्याची ही सर्वात मोठी कारवाई राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या कडक धोरणामुळे अनेक उमेदवार व सदस्यांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)पाच वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला किमान २५ हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या मर्यादेच्या अधिन राहूनच त्यांना निवडणूक खर्च करणे बंधनकारक आहे. निवडणूक काळात होणारा खर्च हा एकाच बँक खात्यातून केला जावा यासाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते काढणे आवश्यक आहे. त्यातील ठराविक रकमेच्या नोंदीही असणे आवश्यक आहे. अवास्तव खर्च टाळण्यासाठी व प्रलोभन देऊन निवडणूक प्रक्रिया बाधित होऊ नये याकरिता आयोगाने असे कठोर निकष घालून दिले आहे. ग्रामपंचायत उमेदवाराला निवडणूक काळातील संपूर्ण खर्चाचे विवरण महिन्याभरात सादर न केल्यास त्या उमेदवारावर पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येणार आहे. कुठल्याही स्वरूपाची निवडणूक या उमेदवारांना लढविता येणार नाही.