शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तमधून दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन

By admin | Updated: August 10, 2015 02:06 IST

शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

यवतमाळ : शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी ३०२ गावांमध्ये २५०३ कामे पूर्ण झाली असून पूर्ण कामातून दीड लाख हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ४१३ गावांमध्ये सदर अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषी विभागासह जलसंपदा, वने, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद सिंचन, लघुसिंचन, भूजल सर्वेक्षण, पाणी पुरवठा या विविध विभागाने अभियानातून कामे हाती घेतली आहे. विविध प्रकारची उपचाराची २७ कामे केली जात असून ४१३ गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे. जुलैअखेर ३०२ गावांमध्ये २५०३ कामे पूर्ण झाली आहे. पावसामुळे कामांना मर्यादा आली असली तरी पावसात सुरु राहू शकत असणारी कामे केली जात असून अशी १८७ कामे सुरु आहेत. अभियानात घेण्यात आलेल्या गावांमध्ये जुने ९१६ सिमेंटनाला बांध व २७ मातीनाला बांध आहे. यापैकी १०४ नालाबांधाची दुरुस्ती करण्यात आली असून ३३४ बांधाचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले. तसेच २४ मातीनाला बांधाची दुरुस्ती झाली. त्यामुळे या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाला आहे. पहिल्या टप्प्यात अभियानांतर्गत निवडलेल्या सर्व ४१३ गावांमध्ये जलसिंचनाची कामे घेऊन ही गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासोबतच गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावात शेततळे, ढाळीचे बांध, विहीर पुनर्भरणाची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात अशा १५ लाखांच्या कामांचा समावेश आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा अभियानाचा उद्देश आहे. (प्रतिनिधी)