शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

जलयुक्तमधून दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन

By admin | Updated: August 10, 2015 02:06 IST

शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

यवतमाळ : शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी ३०२ गावांमध्ये २५०३ कामे पूर्ण झाली असून पूर्ण कामातून दीड लाख हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ४१३ गावांमध्ये सदर अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषी विभागासह जलसंपदा, वने, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद सिंचन, लघुसिंचन, भूजल सर्वेक्षण, पाणी पुरवठा या विविध विभागाने अभियानातून कामे हाती घेतली आहे. विविध प्रकारची उपचाराची २७ कामे केली जात असून ४१३ गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे. जुलैअखेर ३०२ गावांमध्ये २५०३ कामे पूर्ण झाली आहे. पावसामुळे कामांना मर्यादा आली असली तरी पावसात सुरु राहू शकत असणारी कामे केली जात असून अशी १८७ कामे सुरु आहेत. अभियानात घेण्यात आलेल्या गावांमध्ये जुने ९१६ सिमेंटनाला बांध व २७ मातीनाला बांध आहे. यापैकी १०४ नालाबांधाची दुरुस्ती करण्यात आली असून ३३४ बांधाचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले. तसेच २४ मातीनाला बांधाची दुरुस्ती झाली. त्यामुळे या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाला आहे. पहिल्या टप्प्यात अभियानांतर्गत निवडलेल्या सर्व ४१३ गावांमध्ये जलसिंचनाची कामे घेऊन ही गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासोबतच गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावात शेततळे, ढाळीचे बांध, विहीर पुनर्भरणाची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात अशा १५ लाखांच्या कामांचा समावेश आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा अभियानाचा उद्देश आहे. (प्रतिनिधी)