शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख हेक्टरात मोड

By admin | Updated: July 27, 2014 23:58 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर क्षेत्रातले बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

दुबार पेरणीचे संकट : बँकांची पुन्हा कर्जास नकारघंटायवतमाळ : जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर क्षेत्रातले बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाही. या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. मात्र बँका कर्ज द्यायला तयार नाही. यातून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अद्यापही पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.रोहिणी आणि मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाचे गणितच बिघडले. १७ जूनला पाऊस बरसताच शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. यानंतर महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र पाऊस बरसला नाही. यामधील अनेक शेतकऱ्यांचे बियाणे कोरड्या जमिनीत होते. त्यामुळे पाऊस बरसताच हे बियाणे निघणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. दोन लाख हेक्टरपैकी एक लाख ३५ हजार हेक्टरवरचे बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी तजवीज करावी लागत आहे. बँकांनी कर्जाचे वितरण केल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला आहे. कृषी सेवा केंद्राचे विक्रेते उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही. सावकार शेतीचे विक्री खत करून मागतात. त्यामुळे शेतकरी मोठ्या कोंडीत सापडला आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार ३१ आॅगस्ट नंतरच या संपूर्ण बाबींवर विचार होणार आहे. त्यानंतर त्यावर धोरण ठरविले जाणार आहे. त्यामुळे हा मोठा कालावधी शेतकऱ्यांच्या हातून निघून जाणार आहे. संपूर्ण गणितच खरिपावर विसंबून असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. राज्य शासनाने कुठलेही धोरण अथवा बियाण्यांची व्यवस्था केली नाही. बियाणे उगविले नसल्याची तक्रार कंपन्यांकडे नोंदविण्यात आली. त्याची पाहणी आणि त्यानंतर येणारा अहवाल यावरच शेतकऱ्यांना थोडीफार मदत मिळले. राष्ट्रीयीकृत बँकांची पाठ मागील काही दिवसांपूर्वी कृषी मंत्र्यांनी राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वाटपात आघाडीवर असल्याचे सांगितले होते. यातून त्यांनी बँकांची पाठराखण केली. प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यात चित्र यापेक्षा वेगळे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी २७ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा बँक आणि ग्रामीण बँकेने ५० टक्के कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे त्यांना इतर सभासदांना कर्ज वाटप करताना कसरत करावी लागते. राष्ट्रीयीकृत बँकांकडे मोठ्या प्रमाणात निधी असतानाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या बँकांचे सभासद शेतकरी सावकाराच्या दारावर गेले आहे. (शहर वार्ताहर)