शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जिल्ह्यातील १५ शेतकरी आत्महत्येच्या दारातून परत

By admin | Updated: April 29, 2016 02:36 IST

आत्महत्येचा विचार ज्यांच्या मनावर हावी झाला, अशा शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासकीय रूग्णालयात शेतकरी मित्र कक्ष सुरू करण्यात आला.

प्रेरणा प्रकल्प : शेतकरी मित्र कक्षाची पाच महिन्यांतील फलश्रूती, शेतीसोबतच जोडधंदाही स्वीकारलायवतमाळ : आत्महत्येचा विचार ज्यांच्या मनावर हावी झाला, अशा शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासकीय रूग्णालयात शेतकरी मित्र कक्ष सुरू करण्यात आला. गेल्या पाच महिन्यात या कक्षामुळे १५ शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारातून परत आणण्यात यश आले आहे. तर १८० शेतकरी औषधोपचार घेत आहेत. हे शेतकरी आता शेतीसोबतच जोडधंदाही करीत आहे.मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प सुरू झाला. त्या अंतर्गत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला. पाच महिन्यातील या कक्षाचा अनुभव आशादायी ठरला. सुरुवातीच्या काळात कक्षाबाबत जिल्ह्यात पुरेसा प्रचार न झाल्याने प्रतिसाद अत्यल्प होता. शिवाय, शेतकऱ्यांवर मनसोपचार करणार, म्हणजे शेतकऱ्यांना वेडे समजता का, असा प्रश्नही अनेकांनी उच्चारवात उपस्थित केला होता. परंतु, आता या कक्षात दररोज ४०-४५ शेतकरी स्वत:हून उपचारासाठी येतात. त्यातील सर्वच मानसिक रूग्ण नसतात. पण ४-५ जण निराशाग्रस्त आढळतात. कक्षातील मनसोपचार सामाजिक कार्यकर्त्या किरण दिघडे म्हणाल्या, येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिक खचलेपणाची अवस्था तीन प्रकारची असते. सौम्य, मध्यम आणि तीव्र. सौम्य प्रकारातील शेतकऱ्याचे समुपदेशन केले जाते. त्याला १५ दिवसांनी पुन्हा बोलावले जाते. मध्यम प्रकारातील शेतकऱ्याला समुपदेशनासोबतच विविध शेतीविषयक योजनांची माहिती दिली जाते. त्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांना बोलावले जाते. तर तीव्र प्रकारातील शेतकऱ्याला समुपदेशनासोबतच तातडीने औषधोपचार सुरू केला जातो. सध्या १८० शेतकऱ्यांवर अशा प्रकारचा औषधोपचार सुरू आहे. कक्षातील डॉ. सरफराज अहमद सौदागर म्हणाले, नैराश्य आणि मनोरुग्ण यात फरक आहे. मेंदूतील सेरोटोनीन द्रव कमी झाल्यास तीव्र निराशा येते. अशा शेतकऱ्यांवर तातडीने औषधोपचार हाच उपाय आहे.यवतमाळजवळील शेतकरी शासकीय रुग्णालयातील शेतकरी मित्र कक्षात स्वत: येऊ शकतात. मात्र, झरी-उमरखेडसारख्या दूरस्थ तालुक्यातील शेतकऱ्यांना या कक्षाची माहितीही नसते. म्हणून प्रेरणा प्रकल्पाने गावागावातील आशा स्वयंसविकांवर जबाबदारी दिली आहे. निराशाग्रस्त शेतकरी कसा ओळखायचा याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. निराशाग्रस्त शेतकरी शोधून त्या शेतकरी मित्र कक्षात घेऊन येतात. (स्थानिक प्रतिनिधी)प्रेरणा प्रकल्पाला बळीराजा चेतना अभियानाचे पाठबळवासरीचा शेतकरी असा झाला सुखी !घाटंजी तालुक्यातील शेतकरी विजय चिकाटे यांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज घ्यावे लागले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना शेतही विकावे लागले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. गावातील अशा स्वयंसेविकेच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी विजय यांना शेतकरी मित्र कक्षात आणले. येथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जोडधंद्यांची माहिती देण्यात आली. एवढेच नव्हेतर, बळीराजा चेतना अभियानातून गावाला मिळालेल्या निधीतून पाच हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात आले. या पैशातूनच विजय चिकाटे यांनी वासरी गावातच छोटेसे चहाटपरी वजा हॉटेल सुरू केले आहे. लोकांना तलफ भागवून तेही जीवनाचा आनंद घेत आहेत.