शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

जिल्ह्यातील १५ शेतकरी आत्महत्येच्या दारातून परत

By admin | Updated: April 29, 2016 02:36 IST

आत्महत्येचा विचार ज्यांच्या मनावर हावी झाला, अशा शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासकीय रूग्णालयात शेतकरी मित्र कक्ष सुरू करण्यात आला.

प्रेरणा प्रकल्प : शेतकरी मित्र कक्षाची पाच महिन्यांतील फलश्रूती, शेतीसोबतच जोडधंदाही स्वीकारलायवतमाळ : आत्महत्येचा विचार ज्यांच्या मनावर हावी झाला, अशा शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासकीय रूग्णालयात शेतकरी मित्र कक्ष सुरू करण्यात आला. गेल्या पाच महिन्यात या कक्षामुळे १५ शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारातून परत आणण्यात यश आले आहे. तर १८० शेतकरी औषधोपचार घेत आहेत. हे शेतकरी आता शेतीसोबतच जोडधंदाही करीत आहे.मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प सुरू झाला. त्या अंतर्गत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला. पाच महिन्यातील या कक्षाचा अनुभव आशादायी ठरला. सुरुवातीच्या काळात कक्षाबाबत जिल्ह्यात पुरेसा प्रचार न झाल्याने प्रतिसाद अत्यल्प होता. शिवाय, शेतकऱ्यांवर मनसोपचार करणार, म्हणजे शेतकऱ्यांना वेडे समजता का, असा प्रश्नही अनेकांनी उच्चारवात उपस्थित केला होता. परंतु, आता या कक्षात दररोज ४०-४५ शेतकरी स्वत:हून उपचारासाठी येतात. त्यातील सर्वच मानसिक रूग्ण नसतात. पण ४-५ जण निराशाग्रस्त आढळतात. कक्षातील मनसोपचार सामाजिक कार्यकर्त्या किरण दिघडे म्हणाल्या, येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिक खचलेपणाची अवस्था तीन प्रकारची असते. सौम्य, मध्यम आणि तीव्र. सौम्य प्रकारातील शेतकऱ्याचे समुपदेशन केले जाते. त्याला १५ दिवसांनी पुन्हा बोलावले जाते. मध्यम प्रकारातील शेतकऱ्याला समुपदेशनासोबतच विविध शेतीविषयक योजनांची माहिती दिली जाते. त्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांना बोलावले जाते. तर तीव्र प्रकारातील शेतकऱ्याला समुपदेशनासोबतच तातडीने औषधोपचार सुरू केला जातो. सध्या १८० शेतकऱ्यांवर अशा प्रकारचा औषधोपचार सुरू आहे. कक्षातील डॉ. सरफराज अहमद सौदागर म्हणाले, नैराश्य आणि मनोरुग्ण यात फरक आहे. मेंदूतील सेरोटोनीन द्रव कमी झाल्यास तीव्र निराशा येते. अशा शेतकऱ्यांवर तातडीने औषधोपचार हाच उपाय आहे.यवतमाळजवळील शेतकरी शासकीय रुग्णालयातील शेतकरी मित्र कक्षात स्वत: येऊ शकतात. मात्र, झरी-उमरखेडसारख्या दूरस्थ तालुक्यातील शेतकऱ्यांना या कक्षाची माहितीही नसते. म्हणून प्रेरणा प्रकल्पाने गावागावातील आशा स्वयंसविकांवर जबाबदारी दिली आहे. निराशाग्रस्त शेतकरी कसा ओळखायचा याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. निराशाग्रस्त शेतकरी शोधून त्या शेतकरी मित्र कक्षात घेऊन येतात. (स्थानिक प्रतिनिधी)प्रेरणा प्रकल्पाला बळीराजा चेतना अभियानाचे पाठबळवासरीचा शेतकरी असा झाला सुखी !घाटंजी तालुक्यातील शेतकरी विजय चिकाटे यांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज घ्यावे लागले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना शेतही विकावे लागले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. गावातील अशा स्वयंसेविकेच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी विजय यांना शेतकरी मित्र कक्षात आणले. येथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जोडधंद्यांची माहिती देण्यात आली. एवढेच नव्हेतर, बळीराजा चेतना अभियानातून गावाला मिळालेल्या निधीतून पाच हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात आले. या पैशातूनच विजय चिकाटे यांनी वासरी गावातच छोटेसे चहाटपरी वजा हॉटेल सुरू केले आहे. लोकांना तलफ भागवून तेही जीवनाचा आनंद घेत आहेत.