शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

१५ दिवस जिल्ह्यात आधार नोंदणी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:03 IST

जिल्ह्यात एकीकडे आधार नोंदणीचे काम झपाट्याने पूर्णत्वाकडे जात असताना आता कंपनी,

परिचालकांवर गदा : प्रशासन म्हणते, पैसे द्या किंवा मशीन वापरू नका लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे आधार नोंदणीचे काम झपाट्याने पूर्णत्वाकडे जात असताना आता कंपनी, प्रशासन आणि सेतू केंद्र परिचालक यांच्यातील खेचाखेचीत आधार नोंदणीच बंद पडलेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून गावपातळीवरील सेतू केंद्रावर आधार नोंदणी थांबली असून पुढील १५ दिवस तरी हे काम सुरूळीत सुरू होण्याची चिन्हे नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकंदर १५४ परिचालकांकडून सेतू केंद्र चालविले जाते. त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांना गावातच आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आधार नोंदणीचे जिल्ह्याचे कामही तब्बल ९८ टक्के पूर्ण झाले आहे. जेमतेम २ टक्के नागरिकांची नोंदणी शिल्लक असताना वाद उद्भवला आहे. ज्या सीएससी, सीएमएस कंपनीकडून आधारचे काम जिल्हा प्रशासन करवून घेत आहे, त्या कंपन्यांकडून परिचालकांचे मानधन अडविण्यात आले आहे. त्यावरही मात करीत परिचालकांनी आधार नोंदणीच्या कामात खंड पडू दिलेला नव्हता. मात्र, आता प्रशासन या कंपन्यांकडून आधार नोंदणीचे काम काढून महाआॅनलाईनकडे सोपवित आहे. या प्रक्रियेत कंपनीने आणि प्रशासनानेही परिचालकांना मात्र वेठीस धरले आहे. एकतर मशीनच्या रकमेपोटी बँक गॅरंटी म्हणून ५० हजार रुपये जमा करा किंवा आधारची मशीन वापरू नका, असे या परिचालकांना बजावण्यात आले आहे. परंतु, इमाने इतबारे ९८ टक्के काम पूर्ण केलेले असताना केवळ २ टक्के कामासाठी चक्क ५० हजार रूपये कुठून जमा करायचे, असा प्रश्न गावखेड्यातील सेतू केंद्र परिचालकांना पडला आहे. त्यामुळे सर्व १५४ परिचालकांनी मशीनही वापरायची नाही आणि पैसेही जमा करायचे नाही, अशी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून आधार नोंदणीचे कामच थांबले आहे. तर पुढील १५ दिवसांपर्यंत काम सुरूळीत होणे शक्यच नसल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्राने सांगितले. जिल्हास्तरावर समन्वय नाही जिल्ह्यातील आधार नोंदणीच्या कामाचा समन्वय साधण्यासाठी सध्या जिल्हा स्तरावर अधिकाऱ्याची वाणवा निर्माण झाली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात बंद झालेल्या आधार नोंदणीबाबत सध्या कुठेही हाकबोंब होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून काम पाहणारे जिल्हा समन्वयक उमेश घुग्गुसकर यांची नुकतीच नागपूर येथे बदली झाली. त्यानंतर समन्वयाची जबाबदारी कुणालाही सोपविण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर आधारच्या कामाबाबत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा मुख्यालयातील आधार केंद्रही बंद आहे. गावपातळीवरील सेतू केंद्रांना कंपनीच्या आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार अनामत रक्कम जमा करण्याच्या सूचना असू शकतात. - सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ