शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

जनआरोग्य योजनेतून १४७ कोटींचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

महागाईच्या काळात खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महागडा उपचार परवडत नाही. त्यामुळे अनेकांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

ठळक मुद्देसात वर्षातील स्थिती : ४१ हजार रुग्णांसह शेतकऱ्यांनाही लाभ

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला मोफत उपचार मिळतो. त्यासाठी जिल्ह्यात १५ खासगी रुग्णालय, तर आठ शासकीय रुग्णालय योजनेशी जोडलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत ३९ हजार ४८३ रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. या मोबदल्यात खासगी रुग्णालयांना १४७ कोटी ६ लाख ४९ हजार ७९२ रुपयांचा परतावा मिळाला आहे.महागाईच्या काळात खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महागडा उपचार परवडत नाही. त्यामुळे अनेकांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. नंतर युती सरकारच्या काळात योजनेचे नाव बदलवून महात्मा फुले जनआरोग्य योजना करण्यात आली. शिवाय या योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली. सामान्य नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला तर पैशांअभावी त्याला जीव गमवावा लागू शकतो. आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे खासगीतही रुग्णांना मोफत उपचार घेता येत आहे. जनआरोग्य योजनेत लाभार्थींना लाभ मिळवून देण्यामध्ये खासगी रुग्णालय आघाडीवर आहेत. जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह १५ खासगी रुग्णालयातही जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. याशिवाय तीन उपजिल्हा रुग्णालय व पाच ग्रामीण रुग्णालयातही योजनेचा लाभ देण्यात येतो. शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया व इतर दुर्धर आजारांचा उपचार घेणाºया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच खासगी रुग्णालयांना जनआरोग्य योजनेतून उपचार खर्चाच्या मोबदल्यात कोट्यवधींचा परतावा मिळाला आहे. या योजनेत १५ हजार २७९ शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात आला. ४०० च्यावर आजारांवर उपचार केला जातो. यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.