शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे १३८ कोटी दुसऱ्याच योजनांवर खर्च

By admin | Updated: April 27, 2017 00:23 IST

ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या तब्बल १३८ कोटींची दुसरीकडेच विल्हेवाट लावली. पाणी टंचाई उपाययोजना डावलून

चौदावा वित्त आयोग : परस्पर विल्हेवाटीचा भंडाफोड रूपेश उत्तरवार   यवतमाळ ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या तब्बल १३८ कोटींची दुसरीकडेच विल्हेवाट लावली. पाणी टंचाई उपाययोजना डावलून त्यांनी ‘अर्थपूर्ण’ योजनांवर निधी खर्ची घातला. आता उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची ओरड होऊ लागल्याने वास्तव समोर आले. गत दोन वर्षात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून १३८ कोटी रूपये मिळाले. हा निधी प्राधान्याने पिण्याच्या पाण्यावर खर्ची घालावयाचा होता. मात्र ग्रामपंचायतींनी तो दुसरीकडे खर्च केला. परिणामी अनेक गावांमध्ये अद्याप पाणी टंचाई कायम आहे. यावर्षी जिल्ह्यातील ३०८ गावांत पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने कृती आराखड्यात ३३२ उपाययोजना सुचविल्या. त्याकरिता दोन कोटी ८८ लाख रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. या आराखड्यात मूळ उद्देशालाच बगल दिल्याचे दिसून आले. यामुळे कृती आराखडा मंजुरीपूर्वीच वादात सापडला. पाणी टंचाईचा विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात येताच चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून कुठली कामे केली याचा जाब पंचायत विभागाला विचारला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी १६ पंचायत विभागाकडून अहवाल मागविला आहे. हा निधी कशावर खर्च झाला. याचा ६२० पानाचा हा अहवाल पंचायत विभागात आला आहे. या अहवालानंतर ग्रामपंचायतींच्या पाणी टंचाई उपाय योजनांना मंजुरी देणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा कसा उपयोग केला याचा लेखाजोखाच समोर येणार आहे. गाव पातळीवर ठोस उपाय योजनासाठी हालचाली होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला हिशेब जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ९५ मुद्यांची गावनिहाय माहिती मागितली आहे. यात गावाला पाण्यासाठी मिळालेला निधी कुठे खर्च झाला, पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना करणार आहे, याची माहिती त्यांनी मागितली. गेल्या पाच वर्षात विविध उपाययोजनांवर झालेल्या खर्चाचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या. या सर्व घडामोडीनंतर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात ठोस उपाययोजनांसह खर्चाचा हिशेब सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यवतमाळात मे महिन्यात आठ दिवसाआड पाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १.१६ टक्केच पाणी असल्याने आता मृत साठ्याचा वापर केला जाणार आहे. इमर्जन्सी पंपींग करून शहराला मे महिन्यात आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केला जाणार आहे. निळोना जलाशयात केवळ १.१६ टक्के जल शिल्लक आहे. यामुळे मे महिन्यात मृत साठ्याचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात येत आहे. त्याव्दारे पाण्याचा उपसा करून पाणी जॅकवेलपर्यंत पोहोविले जाणार आहे. सध्या निळोणात गढूळ पाण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा उपसा बंद करून चापडोह प्रकल्पातून पाण्याचा उपसा वाढविला जाणार आहे. परिणामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना जपूनच पाणी वापरावे लागणार आहे.