शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

१३०० पाणीपुरवठा योजनांना बसणार शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:59 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.

ठळक मुद्देजोडणी तोडणार : ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची २३ कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.जिल्ह्यात सध्या ११९८ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत दोन हजारांच्यावर गावे आहेत. यापैकी १३०६ गावांमधील पाणीपुरवठा योजनांकडे पाणीपुरवठ्याचे २३ कोटींचे बील थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी बिल भरले नाही. गेल्यावर्षी एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरून चालू बिल भरण्याची सवलत वीज कंपनीने पाणी पुरवठा योजनांना दिली होती. या योजनेत सर्व ग्रामपंचायतांनी सहभाग नोंदविला. मात्र, पुढील थकबाकी ग्रामपंचायतींनी भरलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १३०६ पाणी पुरवठा योजनांकडे २३ कोटी ९४ लाख रूप्ये थकून राहिले.आता वीज वितरण कंपनीला वरिष्ठ पातळीवरून थकीत पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे महावितरण या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी नियोजन करीत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दुष्काळी स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. उन्हाळ्यापूर्वीच या गावांमध्ये पाणी पेटणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे रोजगार नसल्याने ग्रामपंचायतींची पाणी कराची वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना पाणी पुरवठ्याचे थकीत बिल भरता आले नाही. आता वीज पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातच पाण्याची समस्या उभी ठाकणार आहे.पथदिव्यांची थकबाकी २८८ कोटीगाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर पथदिवे लाईट लावण्यात आले. नगरपालिका व नगरपंचायतीत सर्वाधिक पथदिवे आहेत. हे लाईट पादचाºयांना रस्ता दाखवतात. मात्र, त्यांचे बिलच भरण्यात आले नाही. यामुळे २४८८ पथदिव्यांच्या योजनांकडे तब्बल २८८ कोटींची थकबाकी आहे. या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास गावांमध्ये अंधार पसरणार आहे.पाणी पुरवठ्याच्या थकीत बिलासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कंपनीला सूचना मिळाल्या आहे. या योजनांची वीज जोडणी कापण्याचे आदेश आले आहे.- रामेश्वर माहुरेअधीक्षक अभियंता, महावितरण.