शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

१३०० पाणीपुरवठा योजनांना बसणार शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:59 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.

ठळक मुद्देजोडणी तोडणार : ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची २३ कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.जिल्ह्यात सध्या ११९८ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत दोन हजारांच्यावर गावे आहेत. यापैकी १३०६ गावांमधील पाणीपुरवठा योजनांकडे पाणीपुरवठ्याचे २३ कोटींचे बील थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी बिल भरले नाही. गेल्यावर्षी एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरून चालू बिल भरण्याची सवलत वीज कंपनीने पाणी पुरवठा योजनांना दिली होती. या योजनेत सर्व ग्रामपंचायतांनी सहभाग नोंदविला. मात्र, पुढील थकबाकी ग्रामपंचायतींनी भरलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १३०६ पाणी पुरवठा योजनांकडे २३ कोटी ९४ लाख रूप्ये थकून राहिले.आता वीज वितरण कंपनीला वरिष्ठ पातळीवरून थकीत पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे महावितरण या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी नियोजन करीत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दुष्काळी स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. उन्हाळ्यापूर्वीच या गावांमध्ये पाणी पेटणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे रोजगार नसल्याने ग्रामपंचायतींची पाणी कराची वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना पाणी पुरवठ्याचे थकीत बिल भरता आले नाही. आता वीज पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातच पाण्याची समस्या उभी ठाकणार आहे.पथदिव्यांची थकबाकी २८८ कोटीगाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर पथदिवे लाईट लावण्यात आले. नगरपालिका व नगरपंचायतीत सर्वाधिक पथदिवे आहेत. हे लाईट पादचाºयांना रस्ता दाखवतात. मात्र, त्यांचे बिलच भरण्यात आले नाही. यामुळे २४८८ पथदिव्यांच्या योजनांकडे तब्बल २८८ कोटींची थकबाकी आहे. या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास गावांमध्ये अंधार पसरणार आहे.पाणी पुरवठ्याच्या थकीत बिलासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कंपनीला सूचना मिळाल्या आहे. या योजनांची वीज जोडणी कापण्याचे आदेश आले आहे.- रामेश्वर माहुरेअधीक्षक अभियंता, महावितरण.