शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

१३०० पाणीपुरवठा योजनांना बसणार शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:59 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.

ठळक मुद्देजोडणी तोडणार : ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची २३ कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.जिल्ह्यात सध्या ११९८ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत दोन हजारांच्यावर गावे आहेत. यापैकी १३०६ गावांमधील पाणीपुरवठा योजनांकडे पाणीपुरवठ्याचे २३ कोटींचे बील थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी बिल भरले नाही. गेल्यावर्षी एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरून चालू बिल भरण्याची सवलत वीज कंपनीने पाणी पुरवठा योजनांना दिली होती. या योजनेत सर्व ग्रामपंचायतांनी सहभाग नोंदविला. मात्र, पुढील थकबाकी ग्रामपंचायतींनी भरलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १३०६ पाणी पुरवठा योजनांकडे २३ कोटी ९४ लाख रूप्ये थकून राहिले.आता वीज वितरण कंपनीला वरिष्ठ पातळीवरून थकीत पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे महावितरण या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी नियोजन करीत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दुष्काळी स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. उन्हाळ्यापूर्वीच या गावांमध्ये पाणी पेटणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे रोजगार नसल्याने ग्रामपंचायतींची पाणी कराची वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना पाणी पुरवठ्याचे थकीत बिल भरता आले नाही. आता वीज पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातच पाण्याची समस्या उभी ठाकणार आहे.पथदिव्यांची थकबाकी २८८ कोटीगाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर पथदिवे लाईट लावण्यात आले. नगरपालिका व नगरपंचायतीत सर्वाधिक पथदिवे आहेत. हे लाईट पादचाºयांना रस्ता दाखवतात. मात्र, त्यांचे बिलच भरण्यात आले नाही. यामुळे २४८८ पथदिव्यांच्या योजनांकडे तब्बल २८८ कोटींची थकबाकी आहे. या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास गावांमध्ये अंधार पसरणार आहे.पाणी पुरवठ्याच्या थकीत बिलासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कंपनीला सूचना मिळाल्या आहे. या योजनांची वीज जोडणी कापण्याचे आदेश आले आहे.- रामेश्वर माहुरेअधीक्षक अभियंता, महावितरण.