शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

‘पीएमजीएसवाय’चे १३०० अभियंते-कर्मचारी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:39 IST

Yawatmal News दर्जेदार रस्ते बांधकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील राज्यभरात १३०० पेक्षा अधिक अभियंते-कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून वेतन नाहीशासन दिवाळी तरी गोड करणार काय ?

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दर्जेदार रस्ते बांधकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील राज्यभरात १३०० पेक्षा अधिक अभियंते-कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना वेतनच दिले गेलेेले नाही. त्यामुळे आतापर्यंतचे अनेक सण-उत्सव त्यांनी उधारीवर साजरे केले. किमान आता दिवाळीपूर्वी तरी शासनाने वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत ‘महाराष्ट्र ग्रामीण रस्ते  विकास संस्था’  याची स्थापना करण्यात आली. या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी ‘पीएमजीएसवाय’ची दर्जेदार कामे पूर्ण केली. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ मध्ये राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. 

५७ हजार किलोमीटर रस्त्यांचे  निर्माण गेल्या पाच वर्षात ‘पीएमजीएसवाय’ टप्पा १ व २ मधून २७ हजार  किलोमीटर, ‘एमएमजीएसवाय’ मधून ३० हजार  किलोमीटर लांबीचे दर्जेदार रस्ते बांधले गेले. ‘पीएमजीएसवाय’मधून टप्पा-३ अंतर्गत पुन्हा साडेसहा  हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे  नियोजन केले जात आहे.  तेथे अभियंते, तंत्रज्ञ, लेखा अशा विविध स्वरूपाची १३०८ पदे मंजूर आहेत. त्यातील ८०० पदे कंत्राटी आहेत. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातून काही अभियंते प्रतिनियुक्तीवर देण्यात आले आहे. मात्र मे-जूनपासून ‘पीएमजीएसवाय’च्या यंत्रणेला पगार मिळालेला नाही. त्यामुळे उसनवार करून कुटुंबाचा गाडा ओढावा लागत आहे. शासनाने या अभियंते, कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून दिवाळीपूर्वी त्यांचे वेतन अदा करून दिवाळी गोड करावी, अशी मागणी केेली जात आहे.

सहायकापेक्षा कुशल कामगाराला पगार अधिक ‘पीएमजीएसवाय’मध्ये पदवीधर कंत्राटी अभियंत्याला २५ हजार, पदविकाधारकाला २३ हजार, वरिष्ठ व तांत्रिक सहायकाला १३ हजार ८०० तर चालकाला ८ हजार ५० एवढा पगार आहे. त्याचवेळी शासनाच्या दरसूचीनुसार तेथील कुशल कामगाराला ५३९ रुपये तर चालकाला २६८ रुपये प्रतिदिवस असा दर ठरला आहे. सहायकापेक्षा कुशल कामगाराला मासिक पगार अधिक असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Governmentसरकार