शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

१३० व्यापारी-अडत्यांना नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:30 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचा बंद १९ दिवसांपासून सुरू असून शेतकरी अडचणीत आले आहेत.

बाजारसमिती बंदचा १९ वा दिवस : परवाना रद्दची टांगती तलवार, शेतकरी अडचणीत यवतमाळ : कृषी उत्पन्न बाजार समितीचा बंद १९ दिवसांपासून सुरू असून शेतकरी अडचणीत आले आहेत. व्यापारी आणि अडते आपल्या मुद्यावर ठाम असल्याने बाजार समितीने मंगळवारी १३० व्यापारी आणि अडत्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे व्यापारी आणि अडत्यांचा परवाना रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्य शासनाने ५ जुलैला अडतमुक्त बाजार करण्याचा अद्यादेश जाहीर केला. तेव्हापासूनच बाजार समित्यांचा संप सुरू झाला. यवतमाळात ८ जुलैपासून या संपाची झळ शेतकऱ्यांना बसली. शेतमाल विकायचा कुठे, असा कठीण प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून वसूल होणारी अडत रद्द करावी आणि ही अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असा अध्यादेशात उल्लेख आहे. संप सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून १.७५ पैशाची अडत वसूल करण्यात येत होती. अध्यादेशानंतरही अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या सूचना आहे. परंतु व्यापारी १.७५ पैशाऐवजी १ रूपये अडत अडत्यांना देण्यास तयार आहेत. व्यापाऱ्यांचा हा प्रस्ताव अडत्यांनी फेटाळला आहे. शेतकऱ्यांकडून जी अडत वसूल होत होती. तीच अडत व्यापाऱ्यांनी द्यावी, या मागणीवर अडतदार ठाम आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर बाजार समितीचा संप आजही सुरू राहीला आहे. यातून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकांनी १६ जुलैला व्यापारी प्रतिनिधीची बैठक घेतली. बाजार समिती सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी १ टक्का अडत देण्याचा निर्णय घेतला. यावर अडत्यांनी १९ जुलैला बैठक घेऊन व्यापाऱ्यांच्या निर्णयाला विरोध केला. आता प्रशासकांनी व्यापारी आणि अडत्यांना नोटीस बजावली आहे. तत्काळ विषय निकाली काढून खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे. यासंदर्भात व्यापारी अध्यक्ष आणि अडते अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतरही खरेदी सुरू न झाल्यास परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर) अडत्यांनी बोलावली तातडीची बैठक राज्य शासनाच्या अध्यादेशात शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या सूचना आहेत. मात्र ही अडत किती असावी, याचा कुठलाही उल्लेख नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून जी अडत वसूल करण्यात येत होती. तीच अडत व्यापाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे. मात्र व्यापारी द्यायला तयार नाही. यामुळे अडत्यांनी संप कायम ठेवला आहे. मंगळवारी बाजार समितीने नोटीस बजावली आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी यासंदर्भात सर्वच अडत्यांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये एकमताने निर्णय झाल्यावर व्यापाऱ्यांसोबत बसून तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती अडत्यांचे अध्यक्ष गुणवंत पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.