शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

१२८ गावांचा कारभार ४४ ग्रामसेवकांवर

By admin | Updated: August 16, 2014 23:43 IST

वणी पंचायत समितीअंतर्गत जवळपास १२८ गावे आहेत. मात्र त्यांचा कारभार हाकण्यासाठी अवघे ४४ ग्रामसेवक असल्याने ग्रामीण भागाचा विकासच खुंटला आहे.

संजय खाडे - उकणीवणी पंचायत समितीअंतर्गत जवळपास १२८ गावे आहेत. मात्र त्यांचा कारभार हाकण्यासाठी अवघे ४४ ग्रामसेवक असल्याने ग्रामीण भागाचा विकासच खुंटला आहे.ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असलेली व विकास कामाला चालना देणारी संस्था म्हणून ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येतो. या ग्रामपंचायतींवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक कार्य करतात. वणी तालुक्यात या पदांवर केवळ ४४ कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे तालुक्यातील १२८ गावांची जबाबदारी आहे. यात काही गट ग्रामपंचायती आहे़ तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती सध्या कार्यरत आहे़वणी पंचायत समितीअंतर्गत १०१ ग्रामपंचायतींसाठी १० ग्रामविकास अधिकारी व ७२ ग्रामसेवक अशी ८२ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात सध्या केवळ तीन ग्रामविकास अधिकारी व ४१ ग्रामसेवकच कार्यरत आहेत. त्यातही तीन ते चार ग्रामसेवक पंचायत समितीतच कामाला असतात. त्यामुळे प्रत्यक्षात ४० ग्रामसेवकांवरच १०१ ग्रामपंचायती आणि १२८ गावांची जबाबदारी आहे. परिणामी गावांची लोकसंख्या बघून काही ग्रामसेवकांना तीन ते चार गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी अनेक सभा असतात. त्यामुळे ग्रामसेवक महिन्यातून १५ दिवसही गावात पोहोचत नाही़ एकदा सभा संपली की, ग्रामसेवक दुसऱ्याच सभेला उपस्थित होतात. ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे गावाचा विकास होत नाही़ सरपंच व सचिव हे गावातील विकास रथाची दोन चाके आहेत. शासनाच्या विविध नवनवीन योजना शासनाकडून थेट ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येतात. या योजनांची सर्वप्रथम माहिती ग्रामसेवकालाच मिळते. मासिक सभा व ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचविल्या जातात. मात्र ग्रासेवकच नसेल, तर ग्रामस्थांपर्यंत माहिती पोहोचणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.