शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१२८ गावांचा कारभार ४४ ग्रामसेवकांवर

By admin | Updated: August 16, 2014 23:43 IST

वणी पंचायत समितीअंतर्गत जवळपास १२८ गावे आहेत. मात्र त्यांचा कारभार हाकण्यासाठी अवघे ४४ ग्रामसेवक असल्याने ग्रामीण भागाचा विकासच खुंटला आहे.

संजय खाडे - उकणीवणी पंचायत समितीअंतर्गत जवळपास १२८ गावे आहेत. मात्र त्यांचा कारभार हाकण्यासाठी अवघे ४४ ग्रामसेवक असल्याने ग्रामीण भागाचा विकासच खुंटला आहे.ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असलेली व विकास कामाला चालना देणारी संस्था म्हणून ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येतो. या ग्रामपंचायतींवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक कार्य करतात. वणी तालुक्यात या पदांवर केवळ ४४ कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे तालुक्यातील १२८ गावांची जबाबदारी आहे. यात काही गट ग्रामपंचायती आहे़ तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती सध्या कार्यरत आहे़वणी पंचायत समितीअंतर्गत १०१ ग्रामपंचायतींसाठी १० ग्रामविकास अधिकारी व ७२ ग्रामसेवक अशी ८२ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात सध्या केवळ तीन ग्रामविकास अधिकारी व ४१ ग्रामसेवकच कार्यरत आहेत. त्यातही तीन ते चार ग्रामसेवक पंचायत समितीतच कामाला असतात. त्यामुळे प्रत्यक्षात ४० ग्रामसेवकांवरच १०१ ग्रामपंचायती आणि १२८ गावांची जबाबदारी आहे. परिणामी गावांची लोकसंख्या बघून काही ग्रामसेवकांना तीन ते चार गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी अनेक सभा असतात. त्यामुळे ग्रामसेवक महिन्यातून १५ दिवसही गावात पोहोचत नाही़ एकदा सभा संपली की, ग्रामसेवक दुसऱ्याच सभेला उपस्थित होतात. ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे गावाचा विकास होत नाही़ सरपंच व सचिव हे गावातील विकास रथाची दोन चाके आहेत. शासनाच्या विविध नवनवीन योजना शासनाकडून थेट ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येतात. या योजनांची सर्वप्रथम माहिती ग्रामसेवकालाच मिळते. मासिक सभा व ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचविल्या जातात. मात्र ग्रासेवकच नसेल, तर ग्रामस्थांपर्यंत माहिती पोहोचणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.