शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम खात्याचे १२७ कोटी गेले शासनाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे यवतमाळ, पांढरकवडा, पुसद व विशेष प्रकल्प असे चार विभाग आहे. या चार विभागांसाठी एकूण ५४५ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ४१७ कोटी ४० लाख ८१ कोटींचा निधी खर्च झाला. त्यातून कंत्राटदारांची सादर झालेली देयके अदा करण्यात आली. उर्वरित १२७ कोटी ९१ लाखांचा निधी शासनाला परत गेला आहे.

ठळक मुद्देअभियंते बेसावध : चार दिवसपूर्वीच ‘बीडीएस’ बंद केल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मार्च एन्डींगला खर्चासाठी दिलेल्या निधीपैकी एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे १२७ कोटी ९१ लाख ७१ हजार रुपये शासनाला परत गेले आहे. ३१ मार्च ऐवजी अचानक २७ मार्चलाच ‘बीडीएस’ बंद झाल्याचा हा परिणाम सांगितला जात आहे.जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे यवतमाळ, पांढरकवडा, पुसद व विशेष प्रकल्प असे चार विभाग आहे. या चार विभागांसाठी एकूण ५४५ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ४१७ कोटी ४० लाख ८१ कोटींचा निधी खर्च झाला. त्यातून कंत्राटदारांची सादर झालेली देयके अदा करण्यात आली. उर्वरित १२७ कोटी ९१ लाखांचा निधी शासनाला परत गेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ७८ कोटी ७७ लाखांचा निधी एकट्या पुसद विभागाचा आहे. त्या खालोखाल यवतमाळ ३१ कोटी ९२ लाख, पांढरकवडा १४ कोटी १२ लाख तर विशेष प्रकल्प विभागाच्या ३ कोटी ९ लाखांच्या निधीचा समावेश आहे. या परत गेलेल्या निधीबाबत कंत्राटदारांमधून ओरड होत आहे. निधी परत जाण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी होत आहे. तर बांधकाम विभाग ‘बीडीएस’ चार दिवस आधीच बंद झाल्याने १२७ कोटींचा निधी परत गेल्याचे सांगत आहे. दरवर्षी मार्चच्या अखेरीस निधी मिळतो आणि तो ३१ मार्चला सायंकाळपर्यंत खर्च करायचा असतो, त्यासाठी आवश्यक आॅनलाईन साईट ओपन ठेवली जाते. यावर्षी सुरुवातीला २५ मार्चला निधी आला. खर्चाला सहा दिवस शिल्लक आहेत असा विचार करून अभियंत्यांनी नेहमीप्रमाणे देयक मंजुरी व सादरची गती मंद ठेवली, परंतु त्यांची ही संथगती कंत्राटदारांवर बेतली.काही अभियंत्यांचा ‘हिशेब’ जुळेनाकाही अभियंत्यांनी कंत्राटदारांशी ‘हिशेबा’च्या चर्चेत अधिक वेळ घालविला. त्यामुळे कंत्राटदारांना पैसा मिळाला नाही व निधीही परत गेल्याचे सांगितले जाते. एका विभागात निधी वाटताना सापत्न वागणूक दिली गेल्याची ओरड आहे. एकतर आधीच कंत्राटदारांची निधीअभावी गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधींची देयके प्रलंबित आहे. त्यात निधी येऊनही देयक न मिळता तो परत गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.कंत्राटदार संतापलेअचानक शासनाने २७ मार्च रोजी बीडीएस प्रणाली बंद केली. त्यामुळे निधी असूनही तो खर्च करता आला नाही. पर्यायाने एकट्या बांधकाम खात्याचे जिल्ह्याचे १२७ कोटी रुपये परत गेले आहे. या चुकीला नेमके जबाबदार कोण याची चर्चा संतप्त कंत्राटदारांमध्ये होऊ लागली आहे. तर अभियंत्यांकडून शासनाने वेळेपूर्वी अचानक बीडीएस बंद करणे हे प्रमुख कारण सांगितले जात आहे.प्राप्त निधीपैकी बहुतांश निधी वाटला गेला. परंतु अचानक बीडीएस बंद झाल्याने नाईलाजाने उर्वरित निधी परत करावा लागला. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच आर्थिक वर्ष संपण्याच्या चार दिवस आधी बीडीएस बंद करण्याचा प्रकार घडला व त्याचा फटका बसला.- धनंजय चामलवारअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग