शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

१२३ कोटींचे चुकारे अडले

By admin | Updated: June 13, 2017 01:19 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली.

तूर खरेदी थांबली : ८३ हजार क्विंटल तूर गोदामाच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीतील १२५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यामुळे मान्सून तोंडावर असताना पेरण्या करायच्या कशा, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.तूर खरेदीसाठी राज्य शासनाने विविध पाच योजनांची अंमलबजावणी केली. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर तीन लाख ९८ हजार ५१७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी झालेल्या तुरीची किंमत १९७ कोटींच्या घरात आहे.खरेदी झालेल्या तुरीपैकी ७२ कोटी ७६ लाख ६९ हजार १८५ रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. तर १२३ कोटी ९३ लाख ९४ हजार रूपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना भेटायचे आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शासकीय हमी केंद्रात तूर विकल्यांनतर दीड महिन्याचा अवधी लोटला. मात्र, शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे भेटले नाही. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पेरणी करायची कशी, प्रश्न आहे.आधी गोदाम, नंतरच निधीशासकीय तूर खरेदी केंद्रावर प्रचंड आवक आहे. खरेदी झालेली तूर ठेवण्याकरिता गोदामच उपलब्ध नाही. यामुळे खरेदी झालेली ८३ हजार क्विंटल तूर अद्यापही शेडमध्येच पडून आहे. ही तूर गोदामात पोहोचल्यानंतरच चुकाऱ्यांचा निधी वळता होणार आहे. यामुळे तूर तत्काळ गोदामात पोहोचविण्याचे मोठे आव्हान शासकीय केंद्रापुढे निर्माण झाले आहे.