शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये १६ वर्षात १२२ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 29, 2017 00:29 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात गत १६ वर्षात तब्बल १२२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

पुसद : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात गत १६ वर्षात तब्बल १२२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यापैकी शासनदरबारी ५८ आत्महत्या पात्र तर तब्बल ६४ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. तर वर्षभरात १२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती आहे. सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर यामध्ये फसलेला कास्तकार, जीवन कसे जगायचे? या विवंचनेतून ‘एक्झीट’ होतानाचे विदारक चित्र तालुकाभर पाहायला मिळत आहे. मागील वर्षभरात १ जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत तब्बल १२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. २०१६ मध्ये २४ जानेवारीला चिंचघाट येथील रामकृष्ण पवार, १२ एप्रिलला नांदुरा (ईजारा) येथील विजय चव्हाण, १७ एप्रिल रोजी फुलवाडीच्या किसन राठोड १८ मे रोजी कारला (देव) येथील विलास राठोड, २९ जून रोजी बोरी (म.) येथील महिला शेतकरी भागूबाई गव्हाणे यांनी जीवनयात्रा संपविली. ५ जुलै रोजी पारवा (खुर्द) येथील भावराव राठोड, ७ सप्टेंबर रोजी गहुलीचे खुशाल राठोड, २३ सप्टेंबरला वेणी (खुर्द) येथील प्रदीप कटारे व ५ आॅक्टोबर रोजी पारवा (खुर्द) येथील सदाशिव चव्हाण आदी शेतकऱ्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. शिवणी येथील महिला कास्तकार कमलाबाई जामकर यांनी १६ आॅक्टोबर रोजी विष प्राशन करून मृत्युला कवटाळले तर ३ नोव्हेंबरला शिवानगरच्या दिलीप जाधव यांनी गळफास लावून घेतला. कान्हा येथील गणपत ढंगारे यांनी १० डिसेंबर आत्महत्या केली. गत वर्षभरातील १२ पैकी चार शेतकरी आत्महत्या पात्र तर आठ आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या आहेत. (प्रतिनिधी)