शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१२०७ ग्रामपंचायतींचा होणार कायापालट

By admin | Updated: February 11, 2016 02:49 IST

पंचायतराज व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जाणार आहे.

१४ वा वित्त आयोग : यवतमाळ जिल्ह्यातील गाव विकासासाठी मिळणार ५८ कोटी रूपेश उत्तरवार यवतमाळ पंचायतराज व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जाणार आहे. राज्यात यासाठी एक हजार ६३२ कोटींची तरतूद करण्यात आली असून यवतमाळ जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचायतींना ५८ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून जिल्ह्यातील बहुतांश सर्वच ग्रामपंचायतींचा कायापालट होणार आहे. पंचायतराज व्यवस्थेत थेट गावपातळीवर विकास कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे विकास कामांसाठी थेट ग्रामपंचायतींना निधी दिला जात आहे. १६ जुलै रोजी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा पहिला टप्पा वळता झाला होता. अलिकडेच २१ डिसेंबर रोजी दुसरा टप्पाही वळता करण्यात आला. त्यावेळी हा निधी कुठल्या कामावर खर्च करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये गोंधळ दिसत होता. परंतु आता शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. १४ व्या वित्त आयोगातील पहिल्या आर्थिक वर्षाच्या अनुदानातून ९० टक्के निधी ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांवर खर्च करण्याच्या सूचना आहे. पेयजलाचा प्रश्न प्रामुख्याने सोडविला जाणार असून त्यात पाण्याचे स्रोत विकसित करणे, पाणी पुरवठ्यांच्या साधनांची दुरुस्ती, वीज बिल बचतीसाठी सोलर पंप, पाईपलाईन, हातपंप दुरुस्ती आणि थकीत वीज बिल भरण्यासाठी निधी दिला जाणार आहे. यासोबतच घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी पेवर ब्लॉक बसविणे, डास मुक्त गावांसाठी शोष खड्डे, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधणे, सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीसाठी सौरपथदिवे बसविणे आदींसाठी हा निधी खर्च करता येणार आहे. ग्रामपंचायतीला क्रमवारीनुसार कुठल्या कामावर निधी खर्च करायचा याची यादी तयार करावी लागणार आहे. ग्रामसभेच्या मंजुरीनंतर कामाला प्रारंभ करता येईल. या सर्व कामांवर गटविकास अधिकाऱ्यांचे नियोजन राहणार आहे. मिळालेला निधी शासनाने विहित केलेल्या बाबींवरच खर्च करावा लागणार आहे. इतर कामांवर हा निधी खर्च करावयाचा असल्यास त्यासाठी शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परवानगीशिवाय काम केल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर निश्चित करण्यात येणार आहे. मंजूर निधीतून कोणती कामे केली जाणार याचे फलक लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे.