शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

१२०० घरांची पडझड, ७३ हजार मदत

By admin | Updated: August 8, 2015 02:35 IST

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र या पावसाने अद्यापही आॅगस्टची सरासरी गाठलेली नाही. परिणामी जलप्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. यामुळे रबीसह उन्हाळ्यातील पेयजलाचा प्रश्न भविष्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळी पावसाने १२०० घरांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यामध्ये ७३ हजार रुपये सानुग्रह मदत वितरित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेचा सामना दोन् ावेळा करावा लागला. अशा स्थितीत पीक हातातून जाणार असल्याचा धोका निर्माण झाला होता. ४ ते ६ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पाऊस बरसला. आतापर्यंत ३९९ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के आहे. मागिल वर्षी १ आॅगस्टपर्यंत ४९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १०० मिमीची तफावत आहे. यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प पूर्णत: भरले नाहीत. प्रकल्पांना ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी दोन मोठ्या पावसांची आवश्यकता आहे. यानंतर रबी आणि उन्हाळी पिकांचे नियोजन करता येईल. उन्हाळ्यात मुबलक पाण्यासाठी प्रकल्पांमध्ये जलसाठा असणे गरजेचे राहणार आहे. हवामान खात्याने आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल्पपावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे प्रकल्प भरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास उन्हाळ्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर वार्ताहर)