शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

१२०० घरांची पडझड, ७३ हजार मदत

By admin | Updated: August 8, 2015 02:35 IST

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र या पावसाने अद्यापही आॅगस्टची सरासरी गाठलेली नाही. परिणामी जलप्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. यामुळे रबीसह उन्हाळ्यातील पेयजलाचा प्रश्न भविष्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळी पावसाने १२०० घरांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यामध्ये ७३ हजार रुपये सानुग्रह मदत वितरित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेचा सामना दोन् ावेळा करावा लागला. अशा स्थितीत पीक हातातून जाणार असल्याचा धोका निर्माण झाला होता. ४ ते ६ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पाऊस बरसला. आतापर्यंत ३९९ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के आहे. मागिल वर्षी १ आॅगस्टपर्यंत ४९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १०० मिमीची तफावत आहे. यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प पूर्णत: भरले नाहीत. प्रकल्पांना ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी दोन मोठ्या पावसांची आवश्यकता आहे. यानंतर रबी आणि उन्हाळी पिकांचे नियोजन करता येईल. उन्हाळ्यात मुबलक पाण्यासाठी प्रकल्पांमध्ये जलसाठा असणे गरजेचे राहणार आहे. हवामान खात्याने आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल्पपावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे प्रकल्प भरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास उन्हाळ्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर वार्ताहर)