शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

रोजगाराच्या शोधात १२०० कुटुंब परप्रांतात

By admin | Updated: February 6, 2017 00:19 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजुरांसाठी काम उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्यांच्याच अखत्यारीतील

चार तालुके : शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहाने आले वास्तव पुढे रूपेश उत्तरवार   यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजुरांसाठी काम उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्यांच्याच अखत्यारीतील शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहाने मजुरांच्या स्थलांतरणाचे बिंग फोडले आहे. पुसद आणि उमरखेड उपविभागातील चार तालुक्यातून तब्बल १२०० कुटुंब रोजगाराच्या शोधात परप्रांतात गेल्याचे वास्तव पुढे आले आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजना कायदा लागू केला आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला किमान १०० दिवस काम देण्याचा हा कायदा आहे. परंतु आजही अनेकांना काम मिळत नाही. त्यामुळे मजूर गावालगतच्या शहराकडे धाव घेतात. परंतु पुसद, महागाव, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यातील मजुरांनी शहरच नव्हे तर आपल्या प्रदेशाबाहेर कामासाठी धाव घेतल्याचे वास्तव पुढे आले आहे. शिक्षण विभागाच्यावतीने स्थलांतरित मजुरांच्या मुलासाठी हंगामी वसतिगृह चालविले जाते. या शाळांमध्ये नोंदणीकृत असलेल्या मुलांच्या संख्येवरून या चार तालुक्यातून तब्बल १२०० कुटुंब स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी असलेल्या या चार तालुक्यातील वसतिगृहात सध्या एक हजार ३४१ विद्यार्थी नोंदणीकृत आहे. त्यासाठी १२ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे हंगामी वसतिगृह शाळेच्या नियंत्रणात चालविले जातात. येथे नोंदणीकृत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक मात्र रोजगाराच्या शोधात बाहेर गेल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. ऊस तोड, विटभट्टी आणि इतर कामासाठी या मजुरांनी मुंबई, पुणे यासह गुजरातमधील सुरत, वापी, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील विविध शहरात धाव घेतली आहे. या चारही तालुक्यातील अनेक गावात घरांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. तर काही घरात वृद्ध मंडळी तेवढी शिल्लक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे असताना मजुरांचे स्थलांतरण रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे.