शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

१२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे

By admin | Updated: November 2, 2016 00:56 IST

जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. परतीच्या पावसाने त्यामध्ये भर घातली.

उद्दिष्ट वाढविले : अखंड वीज पुरवठ्याचा प्रश्न मात्र कायम, हरभऱ्याची लागवड वाढणाररूपेश उत्तरवार  यवतमाळजिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. परतीच्या पावसाने त्यामध्ये भर घातली. यामुळे यावर्षी तीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. या पेरणीला कुठलाही अडसर निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. याकरिता १२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे जिल्ह्याला मंजूर झाले आहे. तर खरिपातील ६०० कोटींचे कर्जवाटप रब्बीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. यासाठी १२ नोव्हेंबरला पुण्यात अग्रणी बँकांची बैठक बोलावण्यात आली आहे. रब्बीचे नियोजन विजेवर अवलंबून आहे. १२ तास अखंड वीज पुरवठ्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात वारंवार वीज खंडित होत आहे. यावर ठोस उपाय झाल्यास खरीप गेला तरी रब्बीतून स्थिती सुधारण्यास पूर्णत: मदत होणार आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाला परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. परतीच्या पावसाच्या जोरावरच शेतीचे रूप पालटावे म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने पूर्ण नियोजन केले आहे. दरवर्षी सरासरी एक लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होते. यावर्षी हे क्षेत्र तीन लाख २० हजार हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले आहे. केवळ क्षेत्राचाच विस्तार नाही, तर रब्बीचा पेरा पूर्णत्वास जाण्यासाठी संपूर्ण बारकावे तपासले जात आहे.यावर्षी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. त्याकरिता ५५ हजार क्विंटल अनुदानित बियाण्याची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी ६०३० क्विंटल अनुदानित बियाणे मंजूर झाले. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर सहा हजार क्विंटल अनुदानित बियाण्याचा टप्पा नव्याने मंजूर झाला. असे १२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे महाबिज कंपनी जिल्ह्याला देणार आहे. क्विंटलमागे २५०० रूपयांचे अनुदानहरभऱ्याचे दर सर्वाधिक तेज आहे. यामुळे हरभरा बियाण्याचे खुल्या बाजारातील दर १२० ते १५० रूपयांपर्यंत वधारले आहे. महाबीज कंपनी शेतकऱ्यांना ८० रूपये किलो दराने बियाणे देणार आहे. यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे २५०० रूपयाचे अनुदान मिळणार आहे.६०० कोटींचे कर्ज वळते करण्याच्या हालचालीखरिपातील कर्ज वितरणात बँकांनी आखडता हात घेतला. उद्दिष्टाच्या ६५ टक्के कर्जाचेच वाटप केले. रब्बीसाठी ५३ कोटींच्या कर्ज वितरणाचे नियोजन आहे. ही रक्कम वाढीव क्षेत्रासाठी अपुरी आहे. शिवाय खरिपात बँकांनी ३५ टक्के कर्ज वितरित केले नाही. यामुळे ६०० कोटी रूपयांचे कर्ज रब्बीत वळते करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुण्यात बैठक बोलावली आहे. अग्रणी बँकांचा आढावा घेतला जाणार आहे. खरिपात कर्ज न देणाऱ्या बँकांचा रब्बीसाठी आढावा घेतला जाणार आहे. धरणातील पाण्यासोबत सिंचन विहिरी आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओलित करण्यासाठी १२ तास वीज पुरवठा देण्यासाठी वीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे. वीज पुरवठा न देणाऱ्या केंद्राचा अभ्यास केला जाणार आहे. सध्या खंडित वीज पुरवठ्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे. यावर तत्काळ उपाययोजना झाल्यास रब्बीचे क्षेत्र सुधारण्यासोबत रात्रीच्या ओलिताचा प्रश्न निकाली निघणार आहे.