शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्यासाठी १२ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:15 IST

यंदा अपुरा पाऊस कोसळूनही जिल्ह्यात कुठेही तीव्र पाणीटंचाईचा भडका उडाला नाही.

यवतमाळ : यंदा अपुरा पाऊस कोसळूनही जिल्ह्यात कुठेही तीव्र पाणीटंचाईचा भडका उडाला नाही. सलग सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पाणीटंचाईत प्रशासनाला दिलासा दिला. मात्र जिल्ह्यातील १२ गावांना बारा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नेहमीप्रमाणे वेळ प्रशासनावर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ १६० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून यंदा पाणीटंचाईच्या प्रश्नावरुन प्रशासन मात्र रिलॅक्स दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळा आणि पाणीटंचाईचे कायम नाते आहे. दरवर्षी त्याच त्या गावात पाणी टंचाई निर्माण होते. प्रशासन लाखो रुपयांचा कृती आराखडा तयार करून उपाययोजना करते. यंदाही प्रशासनाने १६ ही पंचायत समितीच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता दिली आहे. नऊ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांचा जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा मंजूर झाला आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता नसली तरी अनेक गावात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. तर काही गावात पाण्याचा थेंबही नसल्याने प्रशासनाने त्या गावांसाठी टँकरने पाणी पुरविणे सुरू केले आहे. त्यात पुसद तालुक्यातील बाळवाडी, उपवनवाडी, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, कारला, मारवाडी, वडसद तांडा, राळेगाव तालुक्यातील कारेगाव, नेर तालुक्यातील चिकणी डोमगा, आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर व चिमटा, यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, घाटंजीतील पारवा या गावांचा समावेश आहे. यासोबतच प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करून तब्बल १६० ठिकाणी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. यामध्ये उमरखेड तालुक्यात ६२, वणी तीन, दिग्रस २०, आर्णी २८, मारेगाव पाच, पुसद १६, कळंब दोन, नेर आठ, राळेगाव तीन, दारव्हा पाच, यवतमाळ १२ अशा विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. याशिवाय १८६ गावांमध्ये १९० विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील १०२ विंधन विहिरी योग्य असून ८४ ठिकाण अयोग्य असल्याचे आढळून आले. यापैकी १०० विंधन विहिरींचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असून ९६ प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. ६९ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ तालुक्यातील रूईवाई येथे दोन विंधन विहिरी, घाटंजीतील शिवणी, घाटुंबा, राजूरवाडी येथे प्रत्येकी एक विंधन विहीर आराखड्या व्यतिरिक्त मंजूर करून घेण्यात आली आहे. तात्पुरती नळ योजना दुरुस्तीसाठी ५९ लाख ५० हजाराची तरतूद असून १५ अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहे. त्यातील दहा अंदाजपत्रकांना जिल्हा प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे. नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी पाच कोटी १३ लाख रुपये मंजूर आहेत. यातील ९६ लाख ६० हजार आतापर्यंत खर्च झाले आहेत. त्यातून तब्बल १९९ गावांमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. यातील २५ कामे सुरू झाली असून ३५ कामांची निविदा प्रक्रिया चालू आहे. यवतमाळ तालुक्यातील जामडोह, दिग्रस येथील आनंदवाडी, घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी, पांढरकवडा तालुक्यातील घोन्सी, भाडउमरी येथील नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामाला आराखड्याव्यतिरिक्त मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाची तयारी जोरात असली तरी यावर्षी पाणीटंचाईवरून कुठेही जनक्षेभाला सामोरे जावे लागले नाही. पाणीटंचाई असली तरी त्याची तीव्रता मोठी नसल्याने नागरिकही सहन करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)