शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

१२ अपघात, २२ बळी

By admin | Updated: April 29, 2016 02:27 IST

अनियंत्रित वेग आणि क्षणभरासाठी झालेली नजरचूक अपघातास कारणीभूत ठरत असून जिल्ह्यात गत दोन आठवड्यात विविध १२ अपघातात २२ जणांचा बळी गेला.

दोन आठवडे : ट्रॅक्टर आणि ट्रक झाले अपघाताचे कारण यवतमाळ : अनियंत्रित वेग आणि क्षणभरासाठी झालेली नजरचूक अपघातास कारणीभूत ठरत असून जिल्ह्यात गत दोन आठवड्यात विविध १२ अपघातात २२ जणांचा बळी गेला. ट्रक आणि ट्रॅक्टर अपघाताचे तत्कालिक कारण ठरले असले तरी घाईच त्यामागचे मोठे कारण आहे.अपघात सांगून येत नाही. काळ कुणावर घाला घालेल याचा नेम नाही. लग्नसराईच्या काळात दरवर्षी अपघाताची संख्या वाढते. यंदाही तसेच झाले. एप्रिलच्या अवघ्या १५ दिवसात तब्बल १२ अपघात झाले. संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारा दोन दुचाकींचा अपघात पुसदनजीक २० एप्रिल रोजी दुपारी झाला. यात हर्षी आणि चिलवाडी येथील सात तरुण ठार झाले. ट्रॅक्टरला ओव्हर टेक करताना दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि सात जणांचा बळी गेला. यवतमाळच्या चौसाळा मार्गावर १४ एप्रिल रोजी ट्रॅक्टरला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार आई, मुलगी आणि एक तुरणी ठार झाल्यात. मारेगावजवळ २५ एप्रिलच्या रात्री शिक्षक व त्यांची पत्नी दुचाकीने येत असताना दुभाजकावर आदळून दोघेही ठार झाले. त्याच दिवशी सकाळी दारव्हा मार्गावरील उमरठा नर्सरीत वॅगनआर कारच्या धडकेत दिवसाचा तरुण ठार झाला. संतप्त नागरिकांनी कार पेटवून देवून आपला संताप व्यक्त केला. उमरखेड तालुक्यातील जेवली येथे लग्नासाठी येणाऱ्या महिलेचा ट्रॅक्टरनेच बळी घेतला. दुचाकीला धडक दिल्याने महिला ठार तर तिचा चिमुकला गंभीर जखमी झाला. आर्णी तालुक्याच्या कोसदनी घाटात दुचाकीस्वार महिला ट्रकखाली येण्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली. २१ एप्रिल रोजी यवतमाळलगतच्या पिंपळगाव येथील तरुणाला पांढरकवडा मार्गावारील रामपूरजवळ ट्रकने उडविले. दुचाकीस्वार हेल्मेटही घालून होता. २० एप्रिल रोजी केळापूर येथे अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने इसम ठार झाला, तर १९ एप्रिल रोजी दिग्रस तालुक्यातील सिंगदजवळ कारला ट्रकने धडक दिली. त्यात पोलीस शिपाई जागीच ठार झाला. आर्णी पंचायत समितीचे कर्मचारी लग्नासाठी मराठवाड्यात गेले होते. वारंगा फाट्याजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात लिपिकाला प्राण गमवावा लागला. पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा मार्गावर एका टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी घडली. तर १४ एप्रिल रोजी जोडमोहाजवळ कार उलटून एक जण ठार झाला. (नगर प्रतिनिधी)धडा कधी घेणार ?उन्हाळा म्हणजे लग्नसराई आणि या लग्नसराईत अपघाताने विघ्न येण्याचे प्रमाणही वाढले आहे. बहुतांश अपघात दुपारच्या वेळीच झाल्याचे दिसून येते. अपघातांच्या कारणांची मीमांसा होईल. पोलीस संबंधितांवर कारवाईही करतील. परंतु, या अपघातापासून कुणी धडा घेतील, असे दिसत नाही.