शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

११ वी प्रवेश आॅफलाईन

By admin | Updated: June 18, 2017 00:49 IST

दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

अ‍ॅडमिशनचे नो टेन्शन : ३१ हजार विद्यार्थी, ३६ हजार जागा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात यंदाही आॅफलाईन पद्धतीनेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, दहावीत ३१ हजार ७२२ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असताना अकरावीकरिता जिल्ह्यात तब्बल ३६ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी यंदा ‘नो टेन्शन’ची स्थिती आहे. १३ जून रोजी दहावीचा निकाल संकेतस्थळावर घोषित होताच अकरावी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात दहावीचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळाल्यावर म्हणजे, २४ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्रत्यक्षात २४ रोजी चौथा शनिवार, २५ रोजी रविवार आणि २६ रोजी रमजान ईदची सुटी आल्याने प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून खऱ्या अर्थाने सुरू होईल. विशेष म्हणजे, ही प्रवेश प्रक्रिया स्थानिक शाळा-महाविद्यालयस्तरावरच होईल. जेथे माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग जोडले आहेत, तेथे अकरावीसाठी ८० इतकी प्रवेश क्षमता मंजूर आहे. तर जेथे स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आहे, तेथे १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक वर्ग महाविद्यालयांना जोडलेले आहेत, तेथेही अकराव्या वर्गात १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. जिल्ह्यात अकरावीकरिता ४५५ तुकड्यांना मान्यता असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नये, अशा शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या सूचना आहेत. बारावीच्या प्रवेशाकरिताही हीच क्षमता मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या उपलब्ध जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. परंतु, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता एखाद्या विशिष्ट शाखेकरिता गर्दी होण्याचीही शक्यता आहे. तसेच गावातील उपलब्ध महाविद्यालयांपैकी एखाद्या विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश घेण्यासाठीही अर्जांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश द्यावे लागणार आहे. विनाकारण आंदोलन केल्यास कारवाईचे निर्देश शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पथक प्रवेशासाठी वणीत गेल्या वर्षी वणीतील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत अकरावी प्रवेश मिळू शकला नव्हता. या विद्यार्थ्यांनी यवतमाळात येऊन वारंवार आंदोलनेही केली होती. वणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण बघता यंदाही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकमेव वणीमध्ये अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पथक एलटी महाविद्यालयात दाखल होईल. तेथेच सर्व अर्ज स्वीकारून तेथूनच वणीतील चारही महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.