शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

११० किमी राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण

By admin | Updated: August 4, 2016 00:50 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता धारणी ते करंजी या दुर्गम, धार्मिक व पर्यटन स्थळांना....

धारणी ते करंजी : दुर्गम क्षेत्र, धार्मिक-पर्यटन स्थळांना जोडणार यवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता धारणी ते करंजी या दुर्गम, धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३१५ किलोमीटरच्या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षणही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत तीन स्तरावर झालेल्या सर्वेक्षणात हा महामार्ग ‘फिजीबल’ (होण्यायोग्य) असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. धारणी ते करंजी असा ३१५ किलोमीटरच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. मात्र हा महामार्ग करता येऊ शकतो का यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले. धारणीवरून सुरू होणारा हा महामार्ग परतवाडा, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, जोडमोहा, मोहदा, उमरी, करंजी असा राहणार आहे. बीआरटी अर्थात बॅकवर्ड-रिलिजीएस-टुरिस्ट या योजनेतून या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या माध्यमातून मागासक्षेत्र, धार्मिक क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र जोडले जाणार आहे. आतापर्यंत मागासक्षेत्र व धार्मिक क्षेत्राच्या दृष्टीने सर्वेक्षण झाले आहे. त्यात धारणी ते करंजी हा राष्ट्रीय महामार्ग होण्यास योग्य आहे असा निष्कर्ष काढला गेला आहे. आता पर्यटनाच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असून ते अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. ३१५ किलोमीटरच्या या महामार्गाचे बजेट सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यातून हा ११० किलोमीटरचा महामार्ग जात आहे. या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि ७ सुद्धा जोडला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात या महामार्गासाठी सुमारे ३०० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. काही वनजमीनही या मार्गाच्या निर्माणात येणार असली तरी त्याच्या मंजुरीत हा महामार्ग अडकणार नसल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी हा महामार्ग घाट सरळ करून पूर्ण केला जाऊ शकतो. (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळात दोन रेल्वे उड्डाण पूल या राष्ट्रीय महामार्गासाठी यवतमाळातूनही ढुमणापूरपासून उजवीकडे बायपास काढला जाणार आहे. त्यावर दोन रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल प्रस्तावित केले जाणार आहे. पुढे रुंझा ते मोहदा दरम्यान बायपास आहे. परंतु तो राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा नसल्याने तेथे दुसरा बायपास केला जाणार असल्याची माहिती आहे. नेर बायपासवरुन राजकीय ओढाताण यवतमाळ जिल्ह्यात धारणी ते करंजी या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात तीन प्रमुख बायपास येणार आहे. त्यातील एक बायपास दिग्रस विधानसभा मतदारसंघातील नेर शहराचा आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने अमरावतीकडून नेरकडे येताना डाव्या बाजूला सहा किलोमीटरचा बायपास प्रस्तावित केला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीलासुद्धा तोच बायपास योग्य वाटतो. परंतु तेथील राजकीय इच्छाशक्ती वेगळेच सांगते आहे. राजकीय नेत्यांना हा बायपास अमरावतीवरून नेरकडे येताना उजव्या बाजूला हवा आहे. हे अंतर किमान दहा किलोमीटरचे राहील. एका दाटीवाटीच्या वस्तीमागून हा बायपास जाणार आहे.