शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘मोनसॅन्टो’ला ११ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:50 IST

कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.

ठळक मुद्देग्राहक न्यायालय : पाच शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.कृष्णराव देशट्टीवार (पांढरकवडा), विलास देशट्टीवार व दीपक राठोड (वाघोली), उत्तम झिपा चव्हाण (वसंतनगर) आणि गणेश जाधव (चोपण ता. केळापूर) या शेतकऱ्यांनी ‘मोनसॅन्टो’ कंपनीचे बियाणे खरेदी करून शेतात टोबले. उगवण चांगली झाली. पीक वाढून फुलावर असताना कपाशीची झाडे वाळू लागली. ही बाब सदर शेतकऱ्यांनी पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि गठित समितीने या शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीची पाहणी केली. अजैविक पान असल्याने कपाशीचे पीक वाळून या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट नमुद करण्यात आले.कृषी विभागाच्या अहवालानंतर या शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र टाळाटाळ सुरू केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. बियाण्यांमध्ये अजैविक ताण सहन करण्याची शक्ती नाही म्हणजेच बियाणे सदोष आहे, या निर्णयाप्रत मंच पोहोचले. झालेल्या नुकसानीपोटी कंपनीने विकास देशट्टीवार यांना पाच लाख २० हजार, विलास देशट्टीवार यांना ९० हजार, दीपक राठोड ३६ हजार, उत्तम चव्हाण ६८ हजार आणि गणेश जाधव यांना तीन लाख ९६ हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे. सदर शेतकऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास तसेच तक्रार खर्चापोटी रक्कम द्यावी, असा निर्णय मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे, सुहास आळशी यांनी दिला आहे.५५ न्यायनिवाडे दाखल‘मोनसॅन्टो’ कंपनीने लेखी युक्तीवादासोबत ५५ व इतर वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले होते. याचे बारकाईने अवलोकन केले असता त्यातील परिस्थिती आणि सदर पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे सदर न्यायनिवाडे याप्रकरणाला लागू होत नाही, असे मंचाने निकालपत्रात म्हटले आहे.