शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

११ उत्तम अभयारण्यात टिपेश्वर, पैनगंगा; ‘एमईई’चा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:45 IST

Sanctuaries Yawatmal news  राज्यातील विविध अभयारण्यांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात उत्तम ११ अभयारण्यांमध्ये जिल्ह्यातील टिपेश्वर व पैनगंगा या दोन्ही अभयारण्यांनी स्थान पटकावले आहे.

ठळक मुद्देमात्र अभयारण्याचे व्यवस्थापन सुधारण्याची सूचना

 लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : राज्यातील विविध अभयारण्यांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात उत्तम ११ अभयारण्यांमध्ये जिल्ह्यातील टिपेश्वर व पैनगंगा या दोन्ही अभयारण्यांनी स्थान पटकावले आहे. येथील जैवविविधता चांगली असली तरी अभयारण्यांचे व्यवस्थापन सुधारण्यात यावे, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे.

पांढरकवडा-घाटंजी या दोन तालुक्यांच्या परिसरात असलेले टिपेश्वर अभयारण्य वाघांच्या अधिवासाकरिता गेल्या काही वर्षात उत्तम ठरले आहे. त्यामुळेच या अभयारण्याला ‘व्याघ्रप्रकल्प’ घोषित करण्याची मागणीही होत आहे. परंतु, वाघांची वर्दळ असली म्हणजे एखादे अभयारण्य अव्वल दर्जाचेच आहे, असे नव्हे. त्यासाठी अभयारण्याचे व्यस्थापनही महत्त्वाचे ठरते. म्हणूनच ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्यूएशन’च्या (एमईई) ताज्या अहवालात टिपेश्वर अभयारण्याला अकरा वाघ असूनही सहावी रँक मिळाली आहे. तर ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याने मात्र पहिली रँक मिळविली.

यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये अशा एकंदर ११ ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने २०१८-१९ मध्ये हे मूल्यमापन करण्यात आले होते. या अभ्यासातून टिपेश्वर, पैनगंगा अभयारण्य आणि तेलंगणातील कवल व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘काॅरिडाॅर’ मजबूत करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

अभ्यास करण्यात आलेल्या एकंदर ११ ठिकाणांमध्ये ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याने ७५.९२ टक्के गुण मिळवून पहिली रँक पटकावली. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला ७५.८० टक्के गुणांसह दुसरी रँक मिळाली. मयूरेश्वर सुपे अभयारण्याला ७५ टक्क्यांसह तिसरी रँक मिळाली. ही तिन्ही ठिकाणे ‘उत्तम’ प्रवर्गात नोंदविली गेली. येडसी रामलिंघट ७२.४१, सागरेश्वर ७१.५०, टिपेश्वर ७०.८०, नायगाय मोर अभयारण्य ६६.४०, यावल ६५.८०, नांदुर मधमेश्वर ६४.६०, तुंगारेश्वर ६४ आणि पैनगंगा अभयारण्याला ६२.०६ टक्के गुण मिळाले असून ही ठिकाणी ‘चांगल्या’ प्रवर्गात नोंदविली गेली.

टिपेश्वर अभयारण्यात जरी ११ वाघ असले तरी एमईईने येथील संबंधित अधिकाऱ्यांना टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्याचे व्यवस्थापन आणखी सुधारण्याची सूचना केली आहे. तसेच प्राण्यांसाठी अभयारण्यात सुरक्षित वन कायम राहण्यासाठी पैनगंगामधील एकांबा, सोनदाबी आणि जवराळा या गावांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे. जवळपास १४ गावांचा भार या अभयारण्यावर येत आहे. येथे पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने सुविधांची कमतरता आहे. अभयारण्याचे स्वतंत्र संकेतस्थळ नाही, माहिती केंद्र नाही. तसेच इको-टुरिझमचीही योजना नाही. खरबी रेंजचे विभाजन केल्यास व्यवस्थापन सुधारू शकेल. तसेच रिक्त जागाही भराव्या लागतील.

टॅग्स :Tigerवाघ