शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०३ उमेदवारांत फक्त पाच महिला रिंगणात

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर

पुसद : महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०३ उमेदवारांपैकी ४२ उमेदवार अपक्ष व फक्त पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण १०३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात पुरुषांची संख्या ९८ तर महिलांची संख्या केवळ पाच आहे. त्यात पुसद, उमरखेड मतदारसंघातून प्रत्येकी दोन व दिग्रस मतदारसंघातून एक महिला निवडणूक लढवित आहे. यवतमाळ, वणी, आर्णी व राळेगाव मतदारसंघात एकही महिला निवडणूक रिंगणात नाही. राष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षाने एकाही महिलेला उमेदवारी यवतमाळ जिल्ह्यात दिली नाही. पुसद मतदारसंघातून प्रिती मारोतराव कांबळे व इंदूबाई शाालिकराम तांबारे या दोघी अपक्ष उमेदवार आहेत. उमरखेड मतदारसंघातून शोभा रावसाहेब देशमुख व अन्नपूर्णा मुकिंदा बन्सोड या दोघी अपक्ष उमेदवारच आहे. तर दिग्रस मतदारसंघातून उषा माधवराव लोळगे या वेलफेअर पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या नशीब अजमावित आहेत.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार यवतमाळ मतदारसंघातून एकूण १८ उमेदवार आहेत. यामध्ये एकही महिला उमेदवार नाही. सर्वच पक्षांच्या महिला आघाड्या स्थापित आहेत. महिला पदाधिकारी पाच वर्षे पक्षासाठी सर्वतोपरी पक्षाच्या प्रचार कार्यात सहकार्य करीत असते. महिलांच्या अस्मितेविषयी सर्वच राजकीय नेते वेळोवेळी भाषणे देतात. प्रत्यक्षात मात्र या नेत्यांचा कांगावा हा निव्वळ वांझोटा ठरतो. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पण राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उघडपणे पक्षाच्या कार्यप्रणालीविरुद्ध आवाज का उठवित नाही हा प्रश्न आहे. राजकीय पक्ष निव्वळ स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारीत आहे. निवडणुकीत महिलांना डावलून त्यांच्या कार्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवित आहे. अशा परिस्थितीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आपली नाराजी दाखविली पाहिजे, असा सूर समाजातून उमटत असताना सर्वच राजकीय पक्षांच्या महिला आघाडीतील महिला पदाधिकारी चुप्पी का साधतात हा एक चर्चेचा विषय बनला आहे.