शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

जिल्ह्यातील १०३ उमेदवारांत फक्त पाच महिला रिंगणात

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर

पुसद : महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०३ उमेदवारांपैकी ४२ उमेदवार अपक्ष व फक्त पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण १०३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात पुरुषांची संख्या ९८ तर महिलांची संख्या केवळ पाच आहे. त्यात पुसद, उमरखेड मतदारसंघातून प्रत्येकी दोन व दिग्रस मतदारसंघातून एक महिला निवडणूक लढवित आहे. यवतमाळ, वणी, आर्णी व राळेगाव मतदारसंघात एकही महिला निवडणूक रिंगणात नाही. राष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षाने एकाही महिलेला उमेदवारी यवतमाळ जिल्ह्यात दिली नाही. पुसद मतदारसंघातून प्रिती मारोतराव कांबळे व इंदूबाई शाालिकराम तांबारे या दोघी अपक्ष उमेदवार आहेत. उमरखेड मतदारसंघातून शोभा रावसाहेब देशमुख व अन्नपूर्णा मुकिंदा बन्सोड या दोघी अपक्ष उमेदवारच आहे. तर दिग्रस मतदारसंघातून उषा माधवराव लोळगे या वेलफेअर पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या नशीब अजमावित आहेत.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार यवतमाळ मतदारसंघातून एकूण १८ उमेदवार आहेत. यामध्ये एकही महिला उमेदवार नाही. सर्वच पक्षांच्या महिला आघाड्या स्थापित आहेत. महिला पदाधिकारी पाच वर्षे पक्षासाठी सर्वतोपरी पक्षाच्या प्रचार कार्यात सहकार्य करीत असते. महिलांच्या अस्मितेविषयी सर्वच राजकीय नेते वेळोवेळी भाषणे देतात. प्रत्यक्षात मात्र या नेत्यांचा कांगावा हा निव्वळ वांझोटा ठरतो. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पण राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उघडपणे पक्षाच्या कार्यप्रणालीविरुद्ध आवाज का उठवित नाही हा प्रश्न आहे. राजकीय पक्ष निव्वळ स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारीत आहे. निवडणुकीत महिलांना डावलून त्यांच्या कार्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवित आहे. अशा परिस्थितीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आपली नाराजी दाखविली पाहिजे, असा सूर समाजातून उमटत असताना सर्वच राजकीय पक्षांच्या महिला आघाडीतील महिला पदाधिकारी चुप्पी का साधतात हा एक चर्चेचा विषय बनला आहे.