शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

१०० कोटींचे कर्ज वाटप थांबले

By admin | Updated: June 19, 2014 00:15 IST

खरीप हंगामात शेतकरी कर्जासाठी गर्दी करीत असतानाच अचानक सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांनी बेमुदत संप पुकारल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे

ऐन पेरणीत हजारो शेतकरी अडचणीत : गटसचिवांच्या बेमुदत संपाचा परिणाम यवतमाळ : खरीप हंगामात शेतकरी कर्जासाठी गर्दी करीत असतानाच अचानक सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांनी बेमुदत संप पुकारल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप थांबले असून आठवडाभर ते सुरू होण्याची चिन्हे नाहीत. यवतमाळ जिल्ह्यात आठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. त्यासाठी शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी शासनाने ६२१ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. परंतु गेल्या वर्षीच्या कर्जाची पुरेशी कर्ज वसुलीच होऊ शकली नाही. आतापर्यंत ३०२ कोटी रुपये वसूल झाले आहे. त्यामुळे यावर्षी ४०० कोटींपर्यंत पीक कर्जाचे वाटप होणार आहे. त्यासाठीही जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घ्यावे लागले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत २६२ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. पाऊस पडल्याने आता खरी शेतकऱ्यांची कर्जासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे. नेमकी हीच संधी साधून जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांच्या गटसचिवांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला. त्यामुळे कर्ज मिळवावे कसे असा प्रश्न हजारो शेतकऱ्यांपुढे पडला आहे. सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असते. तेथूनच बँकेकडे कर्ज मागणीचा प्रस्ताव पाठविला जातो. यानंतर बँक शेतकऱ्याला कर्ज मंजूर करते. परंतु हा प्रस्ताव पाठविण्यासाठी आता गटसचिवच सोसायटीमध्ये उपलब्ध नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा संप सुरू आहे. हा संप किमान आठवडाभर आणखी चालण्याची चिन्हे आहेत. पुढील आठवड्यात गटसचिवांचे शिष्टमंडळ सहकार मंत्र्यांना भेटणार आहे. त्या चर्चेत तोडगा निघाला तरच संप मागे घेतला जाईल अन्यथा पुढेही चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. गटसचिवांच्या या संपामुळे जिल्हा बँकेचे सुमारे १०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप प्रभावित झाले आहे. कर्ज वाटपाचे चक्रच जणू आठवडाभरासाठी थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पैसा आणावा कोठून असा पेच निर्माण झाला आहे. आधी कर्जाची उचल केल्यास पैसा घरगुती कामात खर्च होत असल्याने पाऊस पडल्यानंतर कर्ज उचलण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु आता गट सचिवांच्या संपामुळे कर्जच मिळेनासे झाल्याने सावकाराच्या दारी जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात एकूण ५९४ सेवा सहकारी सोसायट्या असून त्यावर १३४ गटसचिव कार्यरत आहेत. प्रत्येक सचिवाकडे चार ते पाच सोसायट्यांची जबाबदारी असल्याने आधीच त्यांच्याकडून बँकांकडे कर्जाचे प्रस्ताव पाठविण्याला विलंब होत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)