शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जि.प. शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना!

By admin | Updated: January 30, 2017 03:26 IST

तांत्रिक अडचण; वाशिम जिल्ह्यातील तीन हजार शिक्षक संभ्रमात

वाशिम, दि. २९- जिल्ह्यांतर्गत येणार्‍या सर्व प्राथमिक शाळांमधील तीन हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणार्‍या भविष्य निर्वाह निधीचा २0१५-१६ चा हिशेबच त्यांना सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकवर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्य निर्वाह निधी म्हणजे सर्वसाधारणपणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी नवृत्त झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारी रक्कम असून, ही रक्कम शिक्षक कर्मचार्‍याच्याच वेतनातून दरमहा निश्‍चित केल्यानुसार कपात करून भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येते. या निधीतून काही रक्कम गरजेनुसार वेळोवेळी काढण्याचा अधिकारही शिक्षकांना असतो. वेतनातून भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करण्यात येणार्‍या रकमेचा वापर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्याच्या हेतूने संबंधित कर्मचारी किंवा शिक्षक करतात; मात्र त्यासाठी त्यांना भविष्य निर्वाह निधीत किती रक्कम आहे, त्याची माहिती असणे आवश्यक असते आणि भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र मिळाल्यानंतरच त्याचा अंदाज येऊ शकतो. २0१५-१६ या वर्षातील याबाबतचे विवरण पत्र प्राथमिक शिक्षकांना अद्याप मिळाले नाही. साधारण ऑगस्ट महिन्यात ही विवरण पत्रे त्यांना मिळायला हवीत; परंतु आता चार महिने उलटले आणि दुसरे आर्थिक वर्ष सुरू झाले तरी, जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचे विवरण पत्रच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्ग संभ्रमात आहे. कपात होणार्‍या जीपीएफच्या रकमेत तफावतशिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन मागील वर्षी ह्यऑनलाइनह्ण झाले. त्यामुळे त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत बर्‍याच वेळेस तफावत येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन वेतन अदायगीत येणारी तफावत जुळवण्यासाठी बराच वेळ लागतो. भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर शासन व्याज देते. चुकीच्या नोंदीमुळे व्याज आकारणी जास्त झाल्यास शासनाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सहावा वेतन आयोग लागल्यानंतर त्यांना देय रक्कम पाच हप्त्यात अदा करावयाची होती. ती अदा करताना हप्ता जमा केल्यानंतर त्याची नोंद सेवापुस्तकात प्रमाणक क्रमांक व दिनांकासह करणे आवश्यक आहे. सदर नोंदी वेळीच न घेतल्याने बर्‍याच कर्मचार्‍यांचे पाचपेक्षा जास्त हप्ते जमा झाले आहेत. जास्त जमा झालेले हप्ते शोधून शासन खाती जमा करणे आवश्यक आहे, तर काही ठिकाणी चुकीचे हप्ता क्रमांक नोंदवल्यामुळे कर्मचार्‍यांचे नुकसान होऊ नये, याचीसुद्धा तपासणी करावी लागत आहे. याच कारणामुळे भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र वितरित करण्यास विलंब होत आहे. तथापि, फेब्रुवारीच्या अखेरीस ही विवरण पत्रे शिक्षकांना वितरित करता येतील, असे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर यांनी सांगितले.