शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

जि.प. शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना!

By admin | Updated: January 30, 2017 03:26 IST

तांत्रिक अडचण; वाशिम जिल्ह्यातील तीन हजार शिक्षक संभ्रमात

वाशिम, दि. २९- जिल्ह्यांतर्गत येणार्‍या सर्व प्राथमिक शाळांमधील तीन हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणार्‍या भविष्य निर्वाह निधीचा २0१५-१६ चा हिशेबच त्यांना सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकवर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्य निर्वाह निधी म्हणजे सर्वसाधारणपणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी नवृत्त झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारी रक्कम असून, ही रक्कम शिक्षक कर्मचार्‍याच्याच वेतनातून दरमहा निश्‍चित केल्यानुसार कपात करून भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येते. या निधीतून काही रक्कम गरजेनुसार वेळोवेळी काढण्याचा अधिकारही शिक्षकांना असतो. वेतनातून भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करण्यात येणार्‍या रकमेचा वापर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्याच्या हेतूने संबंधित कर्मचारी किंवा शिक्षक करतात; मात्र त्यासाठी त्यांना भविष्य निर्वाह निधीत किती रक्कम आहे, त्याची माहिती असणे आवश्यक असते आणि भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र मिळाल्यानंतरच त्याचा अंदाज येऊ शकतो. २0१५-१६ या वर्षातील याबाबतचे विवरण पत्र प्राथमिक शिक्षकांना अद्याप मिळाले नाही. साधारण ऑगस्ट महिन्यात ही विवरण पत्रे त्यांना मिळायला हवीत; परंतु आता चार महिने उलटले आणि दुसरे आर्थिक वर्ष सुरू झाले तरी, जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचे विवरण पत्रच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्ग संभ्रमात आहे. कपात होणार्‍या जीपीएफच्या रकमेत तफावतशिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन मागील वर्षी ह्यऑनलाइनह्ण झाले. त्यामुळे त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत बर्‍याच वेळेस तफावत येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन वेतन अदायगीत येणारी तफावत जुळवण्यासाठी बराच वेळ लागतो. भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर शासन व्याज देते. चुकीच्या नोंदीमुळे व्याज आकारणी जास्त झाल्यास शासनाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सहावा वेतन आयोग लागल्यानंतर त्यांना देय रक्कम पाच हप्त्यात अदा करावयाची होती. ती अदा करताना हप्ता जमा केल्यानंतर त्याची नोंद सेवापुस्तकात प्रमाणक क्रमांक व दिनांकासह करणे आवश्यक आहे. सदर नोंदी वेळीच न घेतल्याने बर्‍याच कर्मचार्‍यांचे पाचपेक्षा जास्त हप्ते जमा झाले आहेत. जास्त जमा झालेले हप्ते शोधून शासन खाती जमा करणे आवश्यक आहे, तर काही ठिकाणी चुकीचे हप्ता क्रमांक नोंदवल्यामुळे कर्मचार्‍यांचे नुकसान होऊ नये, याचीसुद्धा तपासणी करावी लागत आहे. याच कारणामुळे भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र वितरित करण्यास विलंब होत आहे. तथापि, फेब्रुवारीच्या अखेरीस ही विवरण पत्रे शिक्षकांना वितरित करता येतील, असे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर यांनी सांगितले.