शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नियोजनाअभावी जिल्हा परिषदेचा २८.९५ कोटींचा निधी शासनजमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:41 IST

संतोष वानखडे वाशिम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त निधी दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेला पूर्णपणे खर्च करता आला ...

संतोष वानखडे

वाशिम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त निधी दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेला पूर्णपणे खर्च करता आला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील १३४.०२ कोटींपैकी २८ कोटी ९५ लाख ३० हजारांचा निधी विहित मुदतीत खर्च न झाल्याने शासनजमा करण्यात आला.

ग्रामीण भागाचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नाबरोबरच शासनाकडून विविध योजनेंतर्गत निधी प्राप्त होतो. हा निधी दोन वर्षाच्या कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाकडून जिल्हा परिषदेच्या १० विभागांना १३४.०२ कोटींचा निधी मिळाला. हा निधी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंत खर्च होणे आवश्यक होते. दोन वर्षाचा कालावधी असतानाही पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी विहीत मुदतीत २८.९५ कोटींचा निधी खर्च होऊ शकला नाही. हा निधी अखर्चित राहिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला शासनजमा करावा लागला. एकिकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड आहे तर दुसरीकडे शासनाकडून मिळालेला कोट्यवधींचा निधीही विहित मुदतीत खर्च करण्याचे गांभीर्य दाखविले जात नसल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटत असल्याचे दिसून येते.

००००००

निधी अखर्चितला जबाबदार कोण?

कोरोनाकाळात विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून निधीच मिळत नसल्याचे रडगाणे जिल्हावासीयांना ऐकायला मिळत होते. वस्तुस्थिती लक्षात घेतली तर शासनाकडून प्राप्त निधीही जिल्हा परिषदेला विहित मुदतीत खर्च करता आला नाही. अखर्चित राहिलेला तब्बल २८.९५ कोटींचा निधी शासनजमा झाल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

००००००

आरोग्य, बांधकाम विभाग आघाडीवर !

निधी अखर्चित ठेवण्यात आरोग्य व बांधकाम विभाग आघाडीवर असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाचा १२ कोटी ३० लाख ३० हजार, बांधकाम विभागाचा ८ कोटी ५४ लाख ७१ हजाराचा निधी अखर्चित राहिला. सर्वात कमी निधी पंचायत विभागाचा केवळ सात लाख ४८ हजारांचा निधी अखर्चित राहिला.

०००००००००

विरोधकही शांत; आवाज उठविणार कोण?

जिल्हा परिषदेत राकॉं, कॉंग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. भाजपा आणि जिल्हा जनविकास आघाडी विरोधी बाकावर आहे. शासनाकडून प्राप्त निधींचे नियोजन वेळेवर करण्यात सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे यश आले नसल्याचे अखर्चित निधीवरून दिसून येते. नियोजन वेळेवर होत नाही, कोट्यवधींचा निधी अखर्चित राहतो यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणे अपेक्षित असताना, विरोधकही फारसे आक्रमक नसल्याने याप्रकरणी आवाज कोण उठविणार? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.