शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी जिल्हा परिषदेचा २८.९५ कोटींचा निधी शासनजमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:41 IST

संतोष वानखडे वाशिम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त निधी दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेला पूर्णपणे खर्च करता आला ...

संतोष वानखडे

वाशिम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त निधी दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेला पूर्णपणे खर्च करता आला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील १३४.०२ कोटींपैकी २८ कोटी ९५ लाख ३० हजारांचा निधी विहित मुदतीत खर्च न झाल्याने शासनजमा करण्यात आला.

ग्रामीण भागाचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नाबरोबरच शासनाकडून विविध योजनेंतर्गत निधी प्राप्त होतो. हा निधी दोन वर्षाच्या कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाकडून जिल्हा परिषदेच्या १० विभागांना १३४.०२ कोटींचा निधी मिळाला. हा निधी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंत खर्च होणे आवश्यक होते. दोन वर्षाचा कालावधी असतानाही पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी विहीत मुदतीत २८.९५ कोटींचा निधी खर्च होऊ शकला नाही. हा निधी अखर्चित राहिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला शासनजमा करावा लागला. एकिकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड आहे तर दुसरीकडे शासनाकडून मिळालेला कोट्यवधींचा निधीही विहित मुदतीत खर्च करण्याचे गांभीर्य दाखविले जात नसल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटत असल्याचे दिसून येते.

००००००

निधी अखर्चितला जबाबदार कोण?

कोरोनाकाळात विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून निधीच मिळत नसल्याचे रडगाणे जिल्हावासीयांना ऐकायला मिळत होते. वस्तुस्थिती लक्षात घेतली तर शासनाकडून प्राप्त निधीही जिल्हा परिषदेला विहित मुदतीत खर्च करता आला नाही. अखर्चित राहिलेला तब्बल २८.९५ कोटींचा निधी शासनजमा झाल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

००००००

आरोग्य, बांधकाम विभाग आघाडीवर !

निधी अखर्चित ठेवण्यात आरोग्य व बांधकाम विभाग आघाडीवर असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाचा १२ कोटी ३० लाख ३० हजार, बांधकाम विभागाचा ८ कोटी ५४ लाख ७१ हजाराचा निधी अखर्चित राहिला. सर्वात कमी निधी पंचायत विभागाचा केवळ सात लाख ४८ हजारांचा निधी अखर्चित राहिला.

०००००००००

विरोधकही शांत; आवाज उठविणार कोण?

जिल्हा परिषदेत राकॉं, कॉंग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. भाजपा आणि जिल्हा जनविकास आघाडी विरोधी बाकावर आहे. शासनाकडून प्राप्त निधींचे नियोजन वेळेवर करण्यात सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे यश आले नसल्याचे अखर्चित निधीवरून दिसून येते. नियोजन वेळेवर होत नाही, कोट्यवधींचा निधी अखर्चित राहतो यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणे अपेक्षित असताना, विरोधकही फारसे आक्रमक नसल्याने याप्रकरणी आवाज कोण उठविणार? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.