वाशिम : अशुद्ध पाणीपुरवठा आणि निकृष्ट ब्लिचिंग पावडरचा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने चव्हाट्यावर आणताच, जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष बैठक घेऊन शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी ह्यअँक्शन प्लॅनह्ण आखला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या निर्देशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी २५ मे रोजी जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय बैठक घेऊन ह्यअँक्शन प्लॅनह्णची माहिती दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून २६ मेपासून १५ जून २0१५ च्या दरम्यान साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. २५ मे रोजी घेतलेल्या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बायस, साथरोग अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर आदींची उपस्थिती होती. दूषित जलस्रोत, पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर न करणे आणि बोगस ब्लिचिंग पावडरचा वापर करणे याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून वास्तव समोर आणले होते. दूषित पाणीपुरवठय़ामुळे मानोरा तालुक्यातील खांबाळा येथे जलजन्य आजार उद्भवला होता. दूषित पाण्यामुळे उद्भवणार्या साथरोगावर लोकमतने प्रकाशझोत टाकताच, जिल्हा परिषद प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी बैठक घेत अँक्शन प्लॅन तयार केला. पावसाळय़ापूर्वी येणार्या साथरोगांपासून ग्रामीण लोकांचा बचाव करण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. पाणी गुणवत्ता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम राबविण्यात आहे.
शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी जिल्हा परिषद सरसावली
By admin | Updated: May 26, 2015 02:08 IST