शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांसाठी काढावे लागणार ५०० रुपयांचे बँक खाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST

उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच गत सत्रात शाळा बंद असल्याने ...

उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच गत सत्रात शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले, तर उन्हाळ्यात धान्य वाटपही करणे शक्य झाले नाही. आता या आहाराचे पैसे थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती तयार ठेवण्यात यावी, ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शुक्रवार, २५ जूनरोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ११२० शाळांतील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात उन्हाळी सुट्यातील पोषण आहाराची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी मात्र खाते नसलेल्या विद्यार्थ्यांना खाते उघडावे लागणार आहे.

-----------

कोणत्या वर्गात विद्यार्थी

१) पहिली - १९६९०

२) दुसरी - २०९९८

३) तिसरी - १९६९८

४) चौथी - २११७७

५) पाचवी -२१०५२

६) सहावी -२११३६

७) सातवी -२१४३६

८) आठवी -२१५००

-----------

बॉक्स : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये

------

बॉक्स : पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये

------

कोट : उन्हाळी सुट्यांतील पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना देण्याऐवजी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. याबाबत पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांच्या माध्यमातून आधीच खाते असलेले विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याच्या सूचना देण्यास कळविले आहे.

- गजाननराव डाबेराव.

प्र. उपशिक्षणाधिकारी,

जि. प., वाशिम

------------------

कोट : माझा पाल्य सहाव्या वर्गात होता. त्याला उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहार मिळाला नाही. आता त्याची रक्कम मिळणार असल्याने ६०० रुपयांसाठी ५०० रुपये खर्च करून खाते उघडण्यास सांगण्यात येत आहे. हे मुळीच परवडणारे नाही.

- संतोष पवार,

पालक

--------

कोट : माझा पाल्य तिसरीत शिक्षण घेत होता. त्याला उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहार मिळाला नाही. त्याऐवजी खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे कळते; परंतु केवळ ४०० रुपयांसाठी हे खाते उघडणे मुळीच परवडणार नाही.

- संतोष इंगोले,

पालक

------

बँक खाते उघडण्यासाठी लागणार ५०० रुपये

१) मागे शासनाने जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी कुठलीही रक्कम ठेव म्हणून भरण्याची अट काढली होती. त्यामुळे अनेकांना झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे शक्य झाले आता. ही योजना बंद आहे.

२) झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे बंद झाले असून, नव्या खात्यासाठी खातेदारांना ठराविक रक्कम भरावीच लागते. खात्यात ठेव असल्याशिवाय नवे खाते उघडून दिले जात नाही.

३) विद्यार्थ्यांना नवे खाते उघडायचे असेल, तर कोणत्याही बँकेत किमान ५०० रुपये तरी रक्कम भरावीच लागते, ही रक्कम भरल्याशिवाय खाते उघडून मिळू शकत नाही.