शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांसाठी काढावे लागणार ५०० रुपयांचे बँक खाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST

उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच गत सत्रात शाळा बंद असल्याने ...

उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच गत सत्रात शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले, तर उन्हाळ्यात धान्य वाटपही करणे शक्य झाले नाही. आता या आहाराचे पैसे थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती तयार ठेवण्यात यावी, ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शुक्रवार, २५ जूनरोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ११२० शाळांतील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात उन्हाळी सुट्यातील पोषण आहाराची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी मात्र खाते नसलेल्या विद्यार्थ्यांना खाते उघडावे लागणार आहे.

-----------

कोणत्या वर्गात विद्यार्थी

१) पहिली - १९६९०

२) दुसरी - २०९९८

३) तिसरी - १९६९८

४) चौथी - २११७७

५) पाचवी -२१०५२

६) सहावी -२११३६

७) सातवी -२१४३६

८) आठवी -२१५००

-----------

बॉक्स : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये

------

बॉक्स : पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये

------

कोट : उन्हाळी सुट्यांतील पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना देण्याऐवजी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. याबाबत पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांच्या माध्यमातून आधीच खाते असलेले विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याच्या सूचना देण्यास कळविले आहे.

- गजाननराव डाबेराव.

प्र. उपशिक्षणाधिकारी,

जि. प., वाशिम

------------------

कोट : माझा पाल्य सहाव्या वर्गात होता. त्याला उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहार मिळाला नाही. आता त्याची रक्कम मिळणार असल्याने ६०० रुपयांसाठी ५०० रुपये खर्च करून खाते उघडण्यास सांगण्यात येत आहे. हे मुळीच परवडणारे नाही.

- संतोष पवार,

पालक

--------

कोट : माझा पाल्य तिसरीत शिक्षण घेत होता. त्याला उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहार मिळाला नाही. त्याऐवजी खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे कळते; परंतु केवळ ४०० रुपयांसाठी हे खाते उघडणे मुळीच परवडणार नाही.

- संतोष इंगोले,

पालक

------

बँक खाते उघडण्यासाठी लागणार ५०० रुपये

१) मागे शासनाने जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी कुठलीही रक्कम ठेव म्हणून भरण्याची अट काढली होती. त्यामुळे अनेकांना झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे शक्य झाले आता. ही योजना बंद आहे.

२) झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे बंद झाले असून, नव्या खात्यासाठी खातेदारांना ठराविक रक्कम भरावीच लागते. खात्यात ठेव असल्याशिवाय नवे खाते उघडून दिले जात नाही.

३) विद्यार्थ्यांना नवे खाते उघडायचे असेल, तर कोणत्याही बँकेत किमान ५०० रुपये तरी रक्कम भरावीच लागते, ही रक्कम भरल्याशिवाय खाते उघडून मिळू शकत नाही.