शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्यात यंदा २६ बायोगॅस प्रकल्प होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:36 IST

ग्रामीण भागातील स्त्रियांचे चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे व जाळण्याकरितापणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी, बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होणाऱ्या शेणखताचा वापर शेतीसाठी ...

ग्रामीण भागातील स्त्रियांचे चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे व जाळण्याकरितापणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी, बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होणाऱ्या शेणखताचा वापर शेतीसाठी करून सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, शौचालयांची जोडणी बायोगॅस संयंत्रास करून गाव परिसर स्वच्छ राहावा, आदी उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अमलात आली. याअंतर्गत गेल्या २२ वर्षांत जिल्ह्यात तीन घनमीटर क्षमतेचे २१२० बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाले. मात्र, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे जनावरांची संख्या घटल्याने बायोगॅस प्रकल्पांना शेण मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, ५० टक्क्यांपेक्षा अधिक बायोगॅस प्रकल्प बंद पडले आहेत. तसेच बायोगॅस प्रकल्पाची शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याने ही योजना संपुष्टात येण्याच्या मार्गाप्रत पोहोचली आहे. दरम्यान, चालूवर्षी जिल्ह्यात २६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे.

.....................

कोट : जिल्ह्यात गत दोन वर्षांत प्रत्येकी १६ हजार ६०० रुपये अनुदान देय असलेले २७ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले असून यंदा २६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

- विकास बंडगर

कृषी विकास अधिकारी, जि.प., वाशिम