शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दहावीचा निकाल जाहीर ; जिल्ह्याचा निकाल ९९.९८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:31 IST

कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर ...

कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यमापनाच्या पद्धतीचा आधार घेण्यात आला. दहावीचा निकाल लावताना नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ०८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार वाशिम, मालेगाव, कारंजा आणि मानोरा तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला, तर मंगरुळपीर तालुक्याचा ९९.९६ टक्के आणि रिसोड तालुक्याचा ९९.९५ टक्के निकाल लागला.

--------------

संकेतस्थळ क्रॅश झाल्याने पालक, विद्यार्थी निराश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते ; परंतु दुपारचे २ वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परिणामी साईट क्रॅश झाली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंतही साईट पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत होत्या.

--------

असे होते मूल्यमापनाचे सूत्र

विद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असून, विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनात- ३० गुण, विद्यार्थ्यांचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनात २० गुण, विद्यार्थ्यांच्या नववीच्या अंतिम निकालात विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

----

कोट: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन पद्धतीच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षांना प्रविष्ट झालेल्या १९,१९१ विद्यार्थ्यांपैकी १९,१८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले असून, जिल्ह्याचा निकाल ९९.९६ टक्के ठरला आहे.

-आकाश आहाळे,

उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक )

-