शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

राज्यातील जिल्ह्यांमध्ये ‘भारत नेट’ची कामे अपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:31 IST

ऑक्टोबर २०११ मध्ये ‘नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या नावाने अमलात आलेल्या प्रकल्पांतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना १०० एमबीपीएस ...

ऑक्टोबर २०११ मध्ये ‘नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या नावाने अमलात आलेल्या प्रकल्पांतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना १०० एमबीपीएस स्पीडने इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. मात्र, २०१४ पर्यंत याअंतर्गत विशेष कामे झाली नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने २०१५ पासून ‘एनओएफएन’चे ‘भारत नेट’ असे नामकरण करून कामे हाती घेतली. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात देशभरातील एक लाख ग्रामपंचायतींना ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्यात शासनाला यश मिळाले.

नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करून मार्च २०१९ पर्यंत देशभरातील उर्वरित दीड लाख ग्रामपंचायतींना ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्याचे ध्येय बाळगण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश असून, विदर्भातील वाशिम आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये विद्युत खांबांवरून, तर अन्य जिल्ह्यांमध्ये भूमिगत केबल टाकली जाणार आहे. मात्र, विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

..................

कोट :

‘भारत नेट’ प्रकल्पात विदर्भातील दोन जिल्ह्यांचा समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ३४६ ग्रामपंचायतींना ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडले जात आहे. याअंतर्गत ९० टक्के कामे पूर्ण झाली असून, लवकरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- शेख जुनेद

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, भारत नेट, वाशिम