शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

‘सहस्त्र सिंचन’च्या १२00 विहिरींची कामे सुरू

By admin | Updated: April 30, 2017 02:30 IST

उद्दिष्ट गाठण्यासाठी धावपळ ; ३0 जूनपर्यंंत पूर्ण कराव्या लागणार सहा हजार विहिरी.

वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजना राबविली जात आहे. या अंतर्गत ३0 जूनपयर्ंत सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करावयाची असून, १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता कृषी विभागाची धावपळ सुरू आहे. पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २0१६ पयर्ंत अर्ज स्वीकारून १0 जानेवारी २0१७ पयर्ंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपयर्ंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतु या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. त्यामुळे लाभार्थींंची निवड करण्यास विलंब लागला. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांकडून प्राप्त १८ हजार ४४५ अर्जांंपैकी ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेच्या लाभार्थींंची निवड करण्यासाठी सहा तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्यानंतरही मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाशिम तालुक्यात १0 विहिरींची, तर मानोरा तालुक्यात पात्र ठरलेल्या केवळ २ विहिरींची कामे सुरू झाली होती. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही ग्रामसभांचे आयोजनच करण्यात आले नव्हते. त्यामुळे निर्धारित उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे यांनी वारंवार बैठका घेऊन आपल्या सहकार्यांंना कामाची गती वाढविण्यास सांगितले. त्यामुळे शनिवार, २९ एप्रिलपर्यंंत जिल्ह्यात १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू होऊ शकली असून, येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित विहिरी सुरू होऊन सहस्त्र सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.