शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड घेतले जाणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:34 IST

अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम एमआयडीसी४५0 एकर जमीन विनावापर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमध्ये असलेल्या ‘एमआयडीसी’पैकी वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसीत टप्प्याटप्प्याने सर्वच प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. असे असले तरी ५३७ एकर क्षेत्रापैकी आजमितीस केवळ २५ एकर क्षेत्रावरच सात उद्योग उभे झाले. तथापि, गत अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिममध्ये हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्रात ‘एमआयडीसी’ वसलेली आहे. गेल्या काही वर्षांत ‘एमआयडीसी’ परिसरात कोट्यवधी रुपयांचा निधी खचरून चकाचक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. आवश्यक त्या सर्वठिकाणी विद्यूत पथदिवेदेखील लावण्यात आले. उद्योगधंद्यांच्या पाण्याची अडचण भागविण्याकरिता नजीकच्या बोराळा धरणावरून पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र प्राथमिक स्तरावर उद्योगधंद्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्यामुळे अपेक्षित प्रयत्न झाल्यास मोठय़ा कंपन्या वाशिमच्या एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करू शकतात; मात्र त्यासाठी प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची नितांत आवश्यकता भासत आहे.वाशिममध्ये वाटप करण्यात आलेल्या ९७ भूखंडांपैकी आजमितीस सुमारे ९0 भूखंडांवर ज्यांनी मालकी हक्क ठेवला आहे, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून प्रस्तावित उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत बांधकाम करून उद्योग सुरू न झाल्यास भूखंड परत करण्याचा नियम आहे. त्यानुसार, लवकरच भूखंड परत घेण्याची ठोस कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार आहे.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’त उद्योगांसाठी पोषक स्थिती!अमृतसर, इंदूर, खंडवा, अकोला, नांदेड, हैद्राबाद यासह अनेक बड्या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग वाशिममधून गेला असून, आंध्रप्रदेशची सीमादेखील जिल्हय़ापासून काहीच अंतरावरच आहे. मोठय़ा उद्योगधंद्यांसाठी ही बाब निश्‍चितपणे पोषक ठरणारी आहे.

८३0 कोटींचा प्रकल्प वळता झाला नागपुरात!सन २0१५ मध्ये ‘कोका कोला’ या कंपनीच्या काही प्रतिनिधींनी ‘एमआयडीसी’मध्ये जागेची पाहणी केली होती; मात्र त्यांना प्रशासनाकडून तद्वतच राजकीय क्षेत्रातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ८३0 कोटी रुपयांचा हा प्रकल्प वाशिमऐवजी नागपुरात वळता झाला.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’मध्ये उद्योगास लागणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना भूखंड मिळाला, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून उद्योग सुरू करणे क्रमप्राप्त आहे. असे न झाल्यास दिलेला भूखंड परत घेण्याची कार्यवाही केली जाईल.- सी.एस. डोईजडक्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी- 

टॅग्स :MIDCएमआयडीसी