शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावाचे काम रखडलेलेच!

By admin | Updated: May 30, 2017 01:33 IST

शेतकरी नाराज: सात वर्षांपासून जमीन अधिग्रहणाची प्रकिया अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क लोहगाव महागाव : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलले साठवण तलावाचे काम विविध अडचणींमुळे अद्यापही पूर्ण झाले नाही. एकिकडे शासन जलयुक्त शिवार अभियान राबविते, तर दुसरीकडे सुरू केलेल्या जलप्रकल्पांचे कामही पूर्ण करीत नाही. त्यामुळे शासनाचे धोरण नेमके आहे तरी कोणते ते समजणे कठीण होऊन बसले आहे. ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई भासू नये, त्याशिवाय सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला जावा. या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खर्चून ठिकठिकाणी बांध आणि साठवण तलावाची निर्मिती करीत आहे. जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना सुरू करीत आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयेसुद्धा खर्च करीत आहे; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमल बजावणी होत नसल्यामुळे शासनाच्या अब्जावधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. असेच एक उदाहरण कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे पाहायला मिळत आहे. लोहगाव महागाव येथे साधारण पाच वर्षांपूर्वी लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाला मंजुरी मिळाली. या तलावामुळे लोहगाव महागाव परिसरातील जवळपास १३८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार. या तलावासाठी आवश्यक जमिनही शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत करण्यात आली. तलावाच्या कामाचे भूमीपुजन तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि भूमीपुजनानंतर पाच ते सहा महिन्यांतच या तलावाचे काम सुरू झाले. हे काम सुरळीतपणे चालु राहिल्यास मजुरांना रोजगार मिळेल आणि शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लोहगाव महागाव परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु या तलावाचे काम गत दोन वर्षांपासून बंद पडले आहे. यंदा कारंजा तालुक्यावर दुष्काळी स्थिती ओढवल्याने कृषी उत्पन्नात मोठी घट झाली, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला असून, पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. लोहगाव साठवण तलाव वेळेत पूर्ण झाला असता, तर लोहगाव परिसरातील जनतेला उपरोक्त समस्यांचा सामना करावा लागला नसता. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे आज रोजी परिसरात सिंचनासह चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही समस्या जाणवत आहे. त्यामुळे शासनाच्या वेळकाढून धोरणाबाबत परिसरातील जनता व शेतकरी वर्गांत नाराजीचे वातावरण आहे. संबंधितांनी याची जाणीव ठेवून या साठवण तलावाचे काम सुरू करून ते त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी व जनतेकडून होत आहे. लोहगाव महागावच्या तलावासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अधिग्रहणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत सुधारित अंदाजपत्रक तयार करून त्याच्या प्रशासकीय मान्यतेचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. -अमोल पाटीलउपविभागीय अभियंता, लघू पाटबंधारे उपविभाग कारंजा लाड