शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

साठवण तलावाचे काम रखडलेलेच!

By admin | Updated: May 30, 2017 01:33 IST

शेतकरी नाराज: सात वर्षांपासून जमीन अधिग्रहणाची प्रकिया अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क लोहगाव महागाव : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलले साठवण तलावाचे काम विविध अडचणींमुळे अद्यापही पूर्ण झाले नाही. एकिकडे शासन जलयुक्त शिवार अभियान राबविते, तर दुसरीकडे सुरू केलेल्या जलप्रकल्पांचे कामही पूर्ण करीत नाही. त्यामुळे शासनाचे धोरण नेमके आहे तरी कोणते ते समजणे कठीण होऊन बसले आहे. ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई भासू नये, त्याशिवाय सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला जावा. या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खर्चून ठिकठिकाणी बांध आणि साठवण तलावाची निर्मिती करीत आहे. जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना सुरू करीत आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयेसुद्धा खर्च करीत आहे; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमल बजावणी होत नसल्यामुळे शासनाच्या अब्जावधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. असेच एक उदाहरण कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे पाहायला मिळत आहे. लोहगाव महागाव येथे साधारण पाच वर्षांपूर्वी लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाला मंजुरी मिळाली. या तलावामुळे लोहगाव महागाव परिसरातील जवळपास १३८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार. या तलावासाठी आवश्यक जमिनही शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत करण्यात आली. तलावाच्या कामाचे भूमीपुजन तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि भूमीपुजनानंतर पाच ते सहा महिन्यांतच या तलावाचे काम सुरू झाले. हे काम सुरळीतपणे चालु राहिल्यास मजुरांना रोजगार मिळेल आणि शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लोहगाव महागाव परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु या तलावाचे काम गत दोन वर्षांपासून बंद पडले आहे. यंदा कारंजा तालुक्यावर दुष्काळी स्थिती ओढवल्याने कृषी उत्पन्नात मोठी घट झाली, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला असून, पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. लोहगाव साठवण तलाव वेळेत पूर्ण झाला असता, तर लोहगाव परिसरातील जनतेला उपरोक्त समस्यांचा सामना करावा लागला नसता. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे आज रोजी परिसरात सिंचनासह चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही समस्या जाणवत आहे. त्यामुळे शासनाच्या वेळकाढून धोरणाबाबत परिसरातील जनता व शेतकरी वर्गांत नाराजीचे वातावरण आहे. संबंधितांनी याची जाणीव ठेवून या साठवण तलावाचे काम सुरू करून ते त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी व जनतेकडून होत आहे. लोहगाव महागावच्या तलावासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अधिग्रहणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत सुधारित अंदाजपत्रक तयार करून त्याच्या प्रशासकीय मान्यतेचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. -अमोल पाटीलउपविभागीय अभियंता, लघू पाटबंधारे उपविभाग कारंजा लाड