शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:28 IST

निनाद देशमुख  / रिसोड : तालुुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेने आता चांगलाच वेग धरला असून, प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.रिसोड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने या ग्रामपंचायतींची ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचपदाच्या ४३० तर सदस्यपदाच्या ८५१ ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : ७ आॅक्टोबरला मतदान

निनाद देशमुख  / रिसोड : तालुुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेने आता चांगलाच वेग धरला असून, प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

रिसोड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने या ग्रामपंचायतींची ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचपदाच्या ४३० तर सदस्यपदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून प्रचार कार्यास वेग दिला जात आहे. तालुक्यातील दोन ग्रामपंचायती तसेच दोन सरपंच अविरोध झाले आहेत. चार ग्रामपंचायतीचे सदस्य अविरोध झाले असून, अन्य ग्रामपंचायतींचे मिळून एकूण १२१ सदस्य अविरोध झाले आहेत. सरपंच पदासाठी ४१ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे तर सदस्य पदासाठी ४० ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे. 

सरपंच पदाच्या ४१ जागेसाठी १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून कुठे दुहेरी तर कुठे तिहेरी लढत होत असल्याचे दिसून येते. सदस्य पदाच्या २४० जागेसाठी ६३० उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदासाठीदेखील कुठे थेट लढत तर कुठे तिहेरी लढत होत आहे. जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात रिसोड तालुका आपले ‘वजन’ ठेवून आहे. राजकीयदृष्ट्या तसेच ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंतिम चरणात असल्याने लढती अटितटीच्या बनल्या आहेत. 

ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही राजकीय पक्षावर लढविली जात नसली तरी ग्रामपंचायतीच्या सत्तेत आपल्या समर्थकांना, हितचिंतकांना बसविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम पंचायत निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रंगीत तालिम असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे ९ आॅक्टोबरला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.