शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी प्रवेश कुठे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात ...

वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात प्रवेश घेतात. परंतु काही विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यात, तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने २६ जूननंतरच दहावीत नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार आहे. तुर्तास नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी कुठे प्रवेश घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत जवळपास १,३६४ शाळा आहेत. गतवर्षी जिल्ह्यात नववीच्या वर्गात २० हजार ३२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. यंदा नववीची परीक्षा रद्द झाल्याने हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्गात प्रवेश निश्चित होणार आहेत. मात्र, यामधील काही विद्यार्थी हे परजिल्ह्यात शिक्षणासाठी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात शिक्षणासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असल्याने त्यानंतरच दहावीच्या वर्गात नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

०००००

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी २०,३२०

दहावीत प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी- --

00000

२६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया (बॉक्स)

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. बहुतांश विद्यार्थी हे त्याच शाळेत पुढच्या वर्गासाठी प्रवेश घेतात. परंतु, नोकरीवर असलेल्या काही पालकांची बदली झाली तर ते आपल्या पाल्याचे प्रवेश काढून बदलीच्या ठिकाणी शाळेत प्रवेश घेतात.

अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे आता कुठे प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यातील शाळा २६ जून रोजी प्रशासकीय कामासाठी उघडणार आहेत. तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

२६ जूननंतर दहावीत नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, किती विद्यार्थी परजिल्ह्यात शिक्षणासाठी गेले, किती विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नाहीत, याचा आकडा निश्चित होणार आहे.

००००

स्थलांतरणामुळे प्रवेश कमी होण्याची भीती

स्थलांतरण, आर्थिक चणचण आदी कारणांमुळे यंदा प्रवेश कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे परजिल्ह्यातून काही विद्यार्थी शिक्षणासाठी वाशिम जिल्ह्यात आले तर प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा वाढूही शकतो. कोरोनामुळे परजिल्ह्यातील कामगार, मजूर हे स्वजिल्ह्यात परतण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पाल्याचे प्रवेश अन्यत्र होऊ शकतात.

०००००

२६ जूननंतर आकडा निश्चित होईल

कोट

शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात नववीच्या वर्गात २०,३२० विद्यार्थी होते. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने नववीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेत दहावीत प्रवेश घेतीलच, हे तुर्तास तरी निश्चित सांगता येणार आहे. २६ जूनला प्रशासकीय कामासाठी शाळा उघडल्यानंतर दहावीतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निश्चित आकडा कळू शकेल.

- रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम