शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी प्रवेश कुठे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात ...

वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात प्रवेश घेतात. परंतु काही विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यात, तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने २६ जूननंतरच दहावीत नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार आहे. तुर्तास नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी कुठे प्रवेश घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत जवळपास १,३६४ शाळा आहेत. गतवर्षी जिल्ह्यात नववीच्या वर्गात २० हजार ३२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. यंदा नववीची परीक्षा रद्द झाल्याने हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्गात प्रवेश निश्चित होणार आहेत. मात्र, यामधील काही विद्यार्थी हे परजिल्ह्यात शिक्षणासाठी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात शिक्षणासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असल्याने त्यानंतरच दहावीच्या वर्गात नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

०००००

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी २०,३२०

दहावीत प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी- --

00000

२६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया (बॉक्स)

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. बहुतांश विद्यार्थी हे त्याच शाळेत पुढच्या वर्गासाठी प्रवेश घेतात. परंतु, नोकरीवर असलेल्या काही पालकांची बदली झाली तर ते आपल्या पाल्याचे प्रवेश काढून बदलीच्या ठिकाणी शाळेत प्रवेश घेतात.

अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे आता कुठे प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यातील शाळा २६ जून रोजी प्रशासकीय कामासाठी उघडणार आहेत. तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

२६ जूननंतर दहावीत नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, किती विद्यार्थी परजिल्ह्यात शिक्षणासाठी गेले, किती विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नाहीत, याचा आकडा निश्चित होणार आहे.

००००

स्थलांतरणामुळे प्रवेश कमी होण्याची भीती

स्थलांतरण, आर्थिक चणचण आदी कारणांमुळे यंदा प्रवेश कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे परजिल्ह्यातून काही विद्यार्थी शिक्षणासाठी वाशिम जिल्ह्यात आले तर प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा वाढूही शकतो. कोरोनामुळे परजिल्ह्यातील कामगार, मजूर हे स्वजिल्ह्यात परतण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पाल्याचे प्रवेश अन्यत्र होऊ शकतात.

०००००

२६ जूननंतर आकडा निश्चित होईल

कोट

शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात नववीच्या वर्गात २०,३२० विद्यार्थी होते. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने नववीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेत दहावीत प्रवेश घेतीलच, हे तुर्तास तरी निश्चित सांगता येणार आहे. २६ जूनला प्रशासकीय कामासाठी शाळा उघडल्यानंतर दहावीतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निश्चित आकडा कळू शकेल.

- रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम