शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी प्रवेश कुठे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात ...

वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात प्रवेश घेतात. परंतु काही विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यात, तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने २६ जूननंतरच दहावीत नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार आहे. तुर्तास नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी कुठे प्रवेश घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत जवळपास १,३६४ शाळा आहेत. गतवर्षी जिल्ह्यात नववीच्या वर्गात २० हजार ३२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. यंदा नववीची परीक्षा रद्द झाल्याने हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्गात प्रवेश निश्चित होणार आहेत. मात्र, यामधील काही विद्यार्थी हे परजिल्ह्यात शिक्षणासाठी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात शिक्षणासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असल्याने त्यानंतरच दहावीच्या वर्गात नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

०००००

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी २०,३२०

दहावीत प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी- --

00000

२६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया (बॉक्स)

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. बहुतांश विद्यार्थी हे त्याच शाळेत पुढच्या वर्गासाठी प्रवेश घेतात. परंतु, नोकरीवर असलेल्या काही पालकांची बदली झाली तर ते आपल्या पाल्याचे प्रवेश काढून बदलीच्या ठिकाणी शाळेत प्रवेश घेतात.

अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे आता कुठे प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यातील शाळा २६ जून रोजी प्रशासकीय कामासाठी उघडणार आहेत. तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

२६ जूननंतर दहावीत नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, किती विद्यार्थी परजिल्ह्यात शिक्षणासाठी गेले, किती विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नाहीत, याचा आकडा निश्चित होणार आहे.

००००

स्थलांतरणामुळे प्रवेश कमी होण्याची भीती

स्थलांतरण, आर्थिक चणचण आदी कारणांमुळे यंदा प्रवेश कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे परजिल्ह्यातून काही विद्यार्थी शिक्षणासाठी वाशिम जिल्ह्यात आले तर प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा वाढूही शकतो. कोरोनामुळे परजिल्ह्यातील कामगार, मजूर हे स्वजिल्ह्यात परतण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पाल्याचे प्रवेश अन्यत्र होऊ शकतात.

०००००

२६ जूननंतर आकडा निश्चित होईल

कोट

शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात नववीच्या वर्गात २०,३२० विद्यार्थी होते. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने नववीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेत दहावीत प्रवेश घेतीलच, हे तुर्तास तरी निश्चित सांगता येणार आहे. २६ जूनला प्रशासकीय कामासाठी शाळा उघडल्यानंतर दहावीतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निश्चित आकडा कळू शकेल.

- रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम