शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला ...

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. शासकीय नियमानुसार प्रशासनाद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्तांच्या यादीतही विलास राठोड यांचे नाव समाविष्ट झाले, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही.

शेतकरी विलास राठोड हे मेंदुविकाराने ग्रस्त असून, त्यांच्या आईलाही कर्करोगाने ग्रासलेले आहे. त्यामुळे दोघांच्याही उपचारासाठी वर्षाकाठी लाखोंचा खर्च होत आहे. असे असताना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने सारासार विचार करून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

....................

बाॅक्स :

वारंवार निवेदने देऊनही मागणी बेदखल

अतिवृष्टीमुळे लिंबूची बाग पुर्णत: जमीनदोस्त झाली. त्याचा पंचनामा होऊनही नुकसानभरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. यासंबंधी ९ मार्च आणि १८ मार्च २०२१ रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर केले; मात्र मागणी बेदखल ठरविण्यात आली. त्यामुळे पुन्हा कारंजाच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली.