शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

कलम १८८ काय आहे रे भाऊ? पाच हजारांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:26 IST

साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची तीव्रता आजमितीस नागरिकांना उगमत नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची तीव्रता आजमितीस नागरिकांना उगमत नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपला असून, तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. दुसरी लाट ओसल्यानंतर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीवर नवे निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लावले आहेत. कोरोनाचा प्रसार गर्दीद्वारे होतो आहे. त्यामुळे सार्वजनिक गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. यात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार १५९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर शहरात अनिवार्य करण्यात आल्यापासून ५९,१११ वाहनधारकांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करून १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून, गर्दी आवरताना आजही प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.

--------------

बॉक्स: काय आहे कलम १८८

१)१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होतात. तसेच शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी प्रतिबंधात्मक वेगवेगळे आदेश काढतात.

२)या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.

३) विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की तो व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरतो.

-------------------

१) जिल्ह्यातील दाखल गुन्हे - ५१५९

२) वाहने जप्त -२२११

३) दंडवसुली - १,६९,१४, ७००

-----------

बॉक्स : काय होऊ शकते शिक्षा

१) साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

२) दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारवास किंवा एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

३) हा जामीनपात्र गुन्हा असून, मोठ्या संख्येने पोलिस कारवाईचे आकडे समोर येत आहेत. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी कोर्टासमोर येतील. त्यातील काहींना दंड, शिक्षा मिळेल तर काही निर्दोष सुटतील.

--------------

कोट: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कलम १८८ नुसार कारवाई केली जाते. मुळात दंड किवा शिक्षा करणे, हाच या कायद्याचा उद्देश नाही, तर जनतेला परिस्थितीचे गांभीर्य कळावे, त्यांनी नियमांचे पालन करावे म्हणून कारवाई करावी लागते. तथापि, जनता कायद्याचे पालन करण्याबाबत फारशी गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-वसंत परदेसी ,

जिल्हा पोलीस अधीक्षक